शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

जिल्ह्यात ८९ नव्या रुग्णांची भर; दोघांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

रत्नागिरी : सोमवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ पर्यंत खाली आलेली असतानाच मंगळवारी पुन्हा २४ तासांत नव्याने ८९ रुग्णांची ...

रत्नागिरी : सोमवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ पर्यंत खाली आलेली असतानाच मंगळवारी पुन्हा २४ तासांत नव्याने ८९ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दोघांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. १३९ रुग्ण बरे झाले आहेत, तर अबाधित रुग्णांची संख्या २४९० इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ३५७ इतकी आहे तर २३९६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ७३ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तब्बल ७ लाख ३१ हजार ८६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. सोमवारी या संख्येत अधिकच घट झाली. या दिवशी ३५ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले तर या दिवशी एकाही मृत्यूची नोंद नव्हती. मात्र, मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. २४ तासांत सापडलेल्या या रुग्णांमध्ये अँटिजन चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६३ तर आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या २६ आहे. खेड आणि रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक एक अशा एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या ५९८ रुग्ण उपचार घेत असून यापैकी गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या ३२९ तर संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या २६९ इतकी आहे. आतापर्यत २३९६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५० आणि त्यापेक्षा वरील वयोगटातील रुग्ण २०१२ तर सहव्याधी असलेल्यांची संख्या ८४३ आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या आकडेवारीतही वाढ होऊ लागली असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ९६.१३ इतकी असून मृत्यूचे प्रमाण ३.१० टक्के इतके आहे.

सध्या उपचार घेत असलेल्या ५९८ रुग्णांपैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ३५७ तर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २४१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ९ हजार ३८३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्या ३ लाख ७६ हजार ४८९ तर अँटिजन चाचण्यांची संख्या ४ लाख ३२ हजार ८९४ इतकी आहे.