शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत चाळीस नौकांवर कारवाई

By admin | Updated: June 22, 2016 00:08 IST

बंदी आदेशाचा भंग : वरवडेतील प्रकार; नौका मालकांवर खटले

रत्नागिरी : ‘पावसाळी मासेमारी बंदी आदेश’ मोडून समुद्रात मासेमारीला गेलेल्या वरवडे येथील ४० पारंपरिक यांत्रिक नौका मंगळवारी मत्स्यव्यवसाय खात्याने पकडल्या. या नौकांवरील १६ हजार रुपये किमतीचे मासे जप्त करण्यात आले. पकडलेल्या सर्व नौकांच्या मालकांविरोधात तहसीलदारांकडे खटले दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.सागरी व खाड्यांमधील मासेमारीवर पावसाळ्याच्या काळात शासनाने बंदी घातली आहे. १ जून २०१६ पासून ही बंदी सुरू झाली असून, ३१ जुलै रोजी बंदीकाळ संपुष्टात येणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारीला जाणे मच्छिमारांच्या जीविताला धोका निर्माण करणारे आहे. तसेच पावसाळ्याच्या कालावधीत मासे किनाऱ्यावरील पाण्यात प्रजननासाठी येतात. अशावेळी मासेमारी केल्यास नवीन मत्स्यजीव मारले जातात व त्याचा पुढील मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याचे याआधी निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. बंदी असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी अद्यापही छुप्या पद्धतीने यांत्रिक नौकांद्वारे मच्छिमारी केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातही रत्नागिरीसह वरवडे, जयगड, कासारवेली या भागातील काही मच्छिमार दोन सिलिंडरची यंत्रे असलेल्या पारंपरिक नौकांद्वारे मच्छिमारी करून बंदी मोडत असल्याच्या तक्रारी काही मच्छिमारांकडूनच मत्स्यव्यवसाय खात्याकडे करण्यात आल्या आहेत. राजिवडा येथील मच्छिमारांनीही ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमाच्यावेळी मासेमारी बंदी मोडणाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर मत्स्यव्यवसाय खात्यानेही अशा बंदी मोडणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ही पहिलीच कारवाई वरवडे येथे करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी या ४० मासेमारी नौका समुद्रात गेल्या होत्या. याची माहिती मिळताच त्या परत येण्याच्या वेळेआधी मत्स्यव्यवसाय खात्याचे पथक वरवडे जेटी येथे पोहोचले. मासेमारी करून परतलेल्या सर्व नौकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी डी. जे. जाधव, कर्मचारी कृष्णसिंह रघुवंशी, सुरक्षा पर्यवेक्षक धीरज चव्हाण, तुषार करगुटकर, सुशील वैद्य आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)मत्स्यव्यवसाय खात्याची अन्य ठिकाणेही हिटलिस्टवररत्नागिरीसह जिल्ह्यातील किनारपट्टी भागात यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करून बंदी आदेशाचा भंग केला जात असल्याची चर्चा आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय खात्याकडे तक्रारीही आल्या आहेत. मात्र मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय खात्याकडून कारवाईच होत नसल्याने या खात्याकडूनच त्यांना अभय असल्याचा आरोप मच्छिमारांमधून केला जात आहे.