शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

कोकण रेल्वेत विनामास्क फिरणाऱ्या मंडळींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST

रत्नागिरी : कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. कोकण रेल्वेच्या स्थानक परिसरात आणि प्रवासादरम्यान मास्क ...

रत्नागिरी : कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. कोकण रेल्वेच्या स्थानक परिसरात आणि प्रवासादरम्यान मास्क न वापरणाऱ्या मंडळींवर काेकण रेल्वे प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

कोविड रोखण्यासाठी प्रशासन सर्व ती सगळी खबरदारी घेत आहे. कोकण रेल्वेनेही निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रेल्वेमधून प्रवास करताना मास्क न वापरणाऱ्या मंडळींवर कारवाई सुरू झाली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये तपासणी केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या मंडळींकडून प्रतिव्यक्ती ५०० रुपये दंड घेतला जात आहे. गाडीप्रमाणे स्थानक परिसरातही मास्क न वापरणाऱ्या मंडळींविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने कारवाई व दंड वसुलीचे अधिकार रेल्वे प्रशासनाला दिले असून, त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

कोकण रेल्वेत सध्या आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मंडळींना मास्कच्या वापराबरोबरच कोविड प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.