शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

रत्नागिरीतील अनंत भिसे खून प्रकरणातील आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत भरदिवसा झालेल्या अनंत भिसे खूनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रदीप भिसेविरुद्ध केलेले अपील फेटाळले असून, त्याच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरीत भरदिवसा झालेल्या अनंत भिसे खूनप्रकरणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रदीप भिसेविरुद्ध केलेले

अपील फेटाळले असून, त्याच्या निर्दोष ठरवलेल्या निकालावर शिक्कामोर्तब केले

आहे. प्रदीप भिसे यांच्यावतीने वकील राकेश भाटकर यांनी मुंबई

उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर काम पाहिले.

रत्नागिरीतील अनंत भिसे हे १५ डिसेंबर १९९९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान त्यांच्या नातेवाईकांसहित राहत्या घरातील अंगणामध्ये

गप्पा मारत बसले हाेते. त्यावेळी प्रदीप भिसे यांनी त्यांच्यावर

वैयक्तिक वादातून चाकूने वार केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या खुनासाठी प्रदीप भिसे यांना जबाबदार धरून आरोपी करण्यात आले होते. नातेवाईकांनी अनंत भिसे यांना जखमी अवस्थेत रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. रुग्णालयातच त्यांचा मृत्यूपूर्व जबाब तेथेच नोंदवण्यात आला होता.

त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

या

प्रकरणी प्रदीप भिसे यांच्यावर खटला चालविण्यात येत हाेता. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर रत्नागिरीतील

जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रदीप भिसे यांना निर्दोष मुक्त केले होते. सरकार पक्षातर्फे २००२ मध्ये प्रदीप भिसेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली

आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या तफावतीमुळे तसेच

पुराव्याअभावी प्रदीप भिसे यांच्याविरोधातील अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या

खंडपीठाने फेटाळले. हे प्रकरण मुंबई उच्च

न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती भिस्त

यांच्या खंडपीठापुढे चालले.