शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

रत्नागिरीतील अनंत भिसे खून प्रकरणातील आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत भरदिवसा झालेल्या अनंत भिसे खूनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रदीप भिसेविरुद्ध केलेले अपील फेटाळले असून, त्याच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरीत भरदिवसा झालेल्या अनंत भिसे खूनप्रकरणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रदीप भिसेविरुद्ध केलेले

अपील फेटाळले असून, त्याच्या निर्दोष ठरवलेल्या निकालावर शिक्कामोर्तब केले

आहे. प्रदीप भिसे यांच्यावतीने वकील राकेश भाटकर यांनी मुंबई

उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर काम पाहिले.

रत्नागिरीतील अनंत भिसे हे १५ डिसेंबर १९९९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान त्यांच्या नातेवाईकांसहित राहत्या घरातील अंगणामध्ये

गप्पा मारत बसले हाेते. त्यावेळी प्रदीप भिसे यांनी त्यांच्यावर

वैयक्तिक वादातून चाकूने वार केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या खुनासाठी प्रदीप भिसे यांना जबाबदार धरून आरोपी करण्यात आले होते. नातेवाईकांनी अनंत भिसे यांना जखमी अवस्थेत रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. रुग्णालयातच त्यांचा मृत्यूपूर्व जबाब तेथेच नोंदवण्यात आला होता.

त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

या

प्रकरणी प्रदीप भिसे यांच्यावर खटला चालविण्यात येत हाेता. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर रत्नागिरीतील

जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रदीप भिसे यांना निर्दोष मुक्त केले होते. सरकार पक्षातर्फे २००२ मध्ये प्रदीप भिसेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली

आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या तफावतीमुळे तसेच

पुराव्याअभावी प्रदीप भिसे यांच्याविरोधातील अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या

खंडपीठाने फेटाळले. हे प्रकरण मुंबई उच्च

न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती भिस्त

यांच्या खंडपीठापुढे चालले.