शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ८५ टक्के खतपुरवठा

By admin | Updated: April 20, 2016 22:26 IST

कृषी खाते : उर्वरित खत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

रत्नागिरी : जिल्ह्यात भातशेती प्रामुख्याने केली जात असल्याने खरीप हंगामासाठी कृषी खात्याने २० हजार मेट्रीक टन खताची मागणी केली होती. मात्र, मागणीत एक हजाराची घट झाली असून, १९ हजार मेट्रीक टन खत मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी खात्याने एक हजार मेट्रीक टन जादा खत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. जिल्ह््यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. जिल्ह्यासाठी पेरणीकरिता ७ हजार २५.९५ क्विंटल भात मंजूर झाले आहे. संकरित बियाण्यांमध्ये ८८६.०४ क्विंटल व सुधारित प्रकारचे ६१३९ क्विंटल भात उपलब्ध होणार आहे. गतवर्षी जिल्ह््याला ४३६३.९५ क्विंटल भात उपलब्ध झाले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी बियाणांसाठी अधिकची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्याला मंजुरी देखील मिळाली आहे. रोहिणी नक्षत्रापासून काही ठिकाणी भातपेरणी करण्यात येते. धूळवाफेच्या पेरण्या प्राधान्याने केल्या जातात. उर्वरित पेरण्या या मृग नक्षत्रात होतात. एकूणच पर्जन्यमानावर पेरण्यांची स्थिती अवलंबून असते. मात्र, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी खात्याने आधीच मागणी केली असून, बियाणे व खतांचे आवंटन मजूर झाले आहे. मे महिन्यात बियाणे व खते ही कृषी विभागाकडे उपलब्ध होणार असून, तातडीने खरेदी-विक्री संघामार्फत शेतकऱ्यांपर्यंत वितरीत केली जाणार आहेत. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तर जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. यातील ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. नारळ व अन्य बागायतींसाठीही खते वापरण्यात येतात. भात पेरणीनंतर उगवणीपर्यंत अवधी शिल्लक राहत असल्याने बागायतींना खते घालण्याचे काम सुरू होते. त्यामुळे दरवर्षी कृषी खाते खते उपलब्ध करून देत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी युरिया १० हजार ८००, डीएपी ३००, एमओपी ४००, एसएसपी खत ८०० मेट्रीक टन मंजूर झाले आहे. उर्वरित सहा हजार मेट्रीक टन खते विविध मिश्र स्वरूपाची आहेत. गतवर्षी जिल्ह््याला युरिया खत १२ हजार ६०१.५४ मेट्रीक टन इतके मंजूर झाले होते. यावर्षी १० हजार ८०० मेट्रीक टन इतकेच मंजूर झाले आहे. युरियाचा सर्वाधिक वापर जिल्ह्यातील शेतकरी करतात. परंतु, मंजूर युरिया खतामध्ये चक्क २ हजाराची घट आहे. गतवर्षीप्रमाणे व मागणीनुसार जिल्ह्याला २० हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कृषी खात्यातर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा खताचा समाधानकारक पुरवठा होईल, असा जिल्हा प्रशासनाला विश्वास आहे. (प्रतिनिधी) कृषी विभागाला विश्वास : यंदा समाधानकारक खतपुरवठा होणार गेल्या वर्षीपेक्षा यंदा बियाण्यांची मागणी जास्त करण्यात आली असून, त्याला मंजुरीही मिळाल्याने खताचीही जादा मागणी नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात हे खत कृषी विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ खरेदी-विक्री संघाकडे दिले जाणार आहे. त्यानंतर त्या-त्या गावी ते रवाना होणार आहे. यंदा पुरेसा खत पुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास कृषी विभागाला आहे.