शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

‘घरकुलां’साठी आठ कोटी--लोकमतचा प्रभाव

By admin | Updated: March 3, 2015 22:18 IST

काम लागणार मार्गी : लाभार्थींची प्रतीक्षा संपली

रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी ‘घरकुलांकरिता’ ८ कोटी ४५ लाख ८९ हजाराचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, निधीअभावी अपूर्ण राहिलेल्या घरकुलांचे बांधकाम आता मार्गी लागणार आहे. शासनाकडून मागासवर्गीयासांठी विशेषत: दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांकरिता रमाई आवास योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत नेवरे येथील चार लाभार्थींचे ‘घरकुल’ योजनेसाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये लाभार्थींना मंजुरी मिळाल्यानंतर घरकुलांचे काम सुरू झाले. एका घरकुलासाठी एक लाख रूपये खर्च केला जातो. नोव्हेंबरमध्ये संबंधित लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीतर्फे निधीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला. चार लाभार्थ्यांना प्रत्येकी ३५ हजार रूपयेप्रमाणे पैसे देण्यात आले. पहिला हप्ता मंजूर झाल्यानंतर लाभार्थींनी घराच्या चौथऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. चौथरा पूर्ण झाल्यानंतर त्याची छायाचित्र काढून ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे पाठवण्यात आली. काही लाभार्थ्यांनी भिंतीपर्यंत बांधकाम केले आहे. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम रखडले. हीच बाब ‘लोकमत’ने उघड केली.वास्तविक रमाई योजनेतंर्गत तीन टप्प्यात निधीचे वाटप करण्यात येते. मात्र, रमाई आवास योजनेतंर्गत गेल्या तीन महिन्यांत शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे लाभार्थी सातत्याने ग्रामपंचायतीमध्ये फेऱ्या घालत आहेत. ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे सातत्याने संपर्क साधण्यात येत नव्हता. मात्र, पंचायत समितीकडेही निधीच प्राप्त झाला नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेने हा निधी पंचायत समितीकडे वर्ग करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना त्याचा लाभ मिळणार आहे.रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल योजनेसाठी प्रस्तावांची निवड निकषानुसार केली जाते. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना घरकुलासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. गतवर्षी ३८५ लाभार्थींना घरकुलासाठी निधी वितरीत करण्यात आला होता. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यासाठी २१६५ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)