शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडातील ७९ गावांनी काेराेनाेला राेखले वेशीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाचा प्रभावी परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : ग्रामीण जीवनशैली, औद्योगिाीकरणापासून दूर, निसर्गाशी एकरूप ...

- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाचा प्रभावी परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : ग्रामीण जीवनशैली, औद्योगिाीकरणापासून दूर, निसर्गाशी एकरूप असल्याने आणि लाॅगडाऊनचे कडक निर्बंध अवलंबल्यामुळे एका वर्षात मंडणगड तालुक्यातील १०९ गावांपैकी तब्बल ७९ गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव झालेला नाही. तालुकावासीयांनी केलेला त्यागही या संक्रमणाला तालुक्यापासून दूर ठेवण्यास यशस्वी झाला आहे.

मुंबई, पुणे यासारख्या शहरांपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या तालुक्यातील लोक उदरनिर्वाहासाठी शहरांमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे सण, उत्सव वगळता एरवी रिकाम्या असणाऱ्या गावात काेराेना काळात अनेक जण दाखल झाले. त्यामुळे तालुक्यात नेहमीपेक्षा दुप्पट लोक वास्तव्यास होते. मात्र, शासनाच्या नियमांचे पालन आणि स्वत: घेतलेली जबाबदारी यामुळे स्वत:च्या गावात गावाबाहेर १५ दिवस तंबूत आणि शाळेत काढल्यामुळेच गाव कोरोनामुक्त राहिले आहे. यावेळेत गावकऱ्यांनीही चांगले सहकार्य करीत आलेल्या चाकरमान्यांना सर्वतोपरी मदत करून घराबाहेर पडू नये म्हणून सहकार्य केले होते.

गावप्रमुख, वाडीप्रमुख आणी संपूर्ण मुंबई आणि गावातील मंडळांनी याबाबत स्वत: जबाबदारी स्वीकारत अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यामुळे गत वर्षभरात तालुक्यात केवळ १५३ रुग्ण सापडले असून, यातील केवळ ४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गतवर्षी काेरोनाला तालुक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा मोठा वाटा आहे. कडक लाॅकडाऊन शासनाच्या नियमांचे पालन आणि नागरिकांची दक्षता यामुळे तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तालुक्यातील १०९ गावांपैकी केवळ ३० गावांमध्येच काेराेनाचा शिरकाव झाला आहे, तर ७० टक्के गावे आजही काेराेनापासून दूर राहिली आहेत. तालुक्यात वयोवृद्ध नागरिकांची संख्या अधिक आहे. तरुण रोजगारानिमित्त शहरांकडे स्थलांतरित झालेला आहे. त्यामुळे गावात वयस्क आणि मुलांची संख्या जास्त असूनही कोरोना गावाबाहेर ठेवण्यात यश आले आहे.

चौकट

कोरोनाचा सर्वाधिक आर्थिक फटका तालुक्याला बसला. चाकरमान्यांचा रोजगार हिरावला गेला. वर्षानुवर्षे जमवलेली पुंजी कोरोनात खर्ची करण्यात आली. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.