शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडातील ७९ गावांनी काेराेनाेला राेखले वेशीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाचा प्रभावी परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : ग्रामीण जीवनशैली, औद्योगिाीकरणापासून दूर, निसर्गाशी एकरूप ...

- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाचा प्रभावी परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : ग्रामीण जीवनशैली, औद्योगिाीकरणापासून दूर, निसर्गाशी एकरूप असल्याने आणि लाॅगडाऊनचे कडक निर्बंध अवलंबल्यामुळे एका वर्षात मंडणगड तालुक्यातील १०९ गावांपैकी तब्बल ७९ गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव झालेला नाही. तालुकावासीयांनी केलेला त्यागही या संक्रमणाला तालुक्यापासून दूर ठेवण्यास यशस्वी झाला आहे.

मुंबई, पुणे यासारख्या शहरांपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या तालुक्यातील लोक उदरनिर्वाहासाठी शहरांमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे सण, उत्सव वगळता एरवी रिकाम्या असणाऱ्या गावात काेराेना काळात अनेक जण दाखल झाले. त्यामुळे तालुक्यात नेहमीपेक्षा दुप्पट लोक वास्तव्यास होते. मात्र, शासनाच्या नियमांचे पालन आणि स्वत: घेतलेली जबाबदारी यामुळे स्वत:च्या गावात गावाबाहेर १५ दिवस तंबूत आणि शाळेत काढल्यामुळेच गाव कोरोनामुक्त राहिले आहे. यावेळेत गावकऱ्यांनीही चांगले सहकार्य करीत आलेल्या चाकरमान्यांना सर्वतोपरी मदत करून घराबाहेर पडू नये म्हणून सहकार्य केले होते.

गावप्रमुख, वाडीप्रमुख आणी संपूर्ण मुंबई आणि गावातील मंडळांनी याबाबत स्वत: जबाबदारी स्वीकारत अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यामुळे गत वर्षभरात तालुक्यात केवळ १५३ रुग्ण सापडले असून, यातील केवळ ४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गतवर्षी काेरोनाला तालुक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा मोठा वाटा आहे. कडक लाॅकडाऊन शासनाच्या नियमांचे पालन आणि नागरिकांची दक्षता यामुळे तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तालुक्यातील १०९ गावांपैकी केवळ ३० गावांमध्येच काेराेनाचा शिरकाव झाला आहे, तर ७० टक्के गावे आजही काेराेनापासून दूर राहिली आहेत. तालुक्यात वयोवृद्ध नागरिकांची संख्या अधिक आहे. तरुण रोजगारानिमित्त शहरांकडे स्थलांतरित झालेला आहे. त्यामुळे गावात वयस्क आणि मुलांची संख्या जास्त असूनही कोरोना गावाबाहेर ठेवण्यात यश आले आहे.

चौकट

कोरोनाचा सर्वाधिक आर्थिक फटका तालुक्याला बसला. चाकरमान्यांचा रोजगार हिरावला गेला. वर्षानुवर्षे जमवलेली पुंजी कोरोनात खर्ची करण्यात आली. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.