शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरी जिल्ह्यात ४६९ कोरोनाबाधित रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे आणखी ४६९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६६,५१० झाली आहे. तर कोरोनाने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे आणखी ४६९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६६,५१० झाली आहे. तर कोरोनाने १० रुग्णांचा बळी गेला असून, मृत्यूची संख्या १,९०० झाली आहे.

आराेग्य विभागाकडून जिल्ह्यात ५,४९० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआरचे २६३ तर अँटिजनचे २०६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. मंडणगड तालुक्यात ४ रुग्ण, दापोलीत १९, खेडमध्ये २८, गुहागरात २०, चिपळुणात १३३, संगमेश्वरात २५, रत्नागिरीत १४९, लांजात ४३ आणि राजापुरातील ४८ रुग्णांचा समावेश आहे. चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण वाढले आहेत. रत्नागिरी तालुक्याचा सर्वात जास्त पॉझिटिव्हिटी दर ११.२२ टक्के आहे.

जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण तर दापोली, गुहागर, खेड, संगमेश्वरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित मृतांचा दर २.८६ टक्के तर रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून तो ९१.७ टक्के आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण ३,६०९ आहेत. गृहविलगीकरणात १,४०९ रुग्ण असून संस्थात्मक विलगीकरणात २,२०० रुग्ण आहेत.

-----------------

तब्बल १,२६८ रुग्णांची काेराेनावर मात

जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढत असतानाच काेराेनातून बरे हाेणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दिवसभरात १,२६८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६०,५७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा रुग्ण बरे हाेण्याचा दर ९१ टक्के इतका आहे.