शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बाधित रस्ता दुरुस्तीचे ४६ लाखांचे प्रस्ताव पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

राजापूर : अतिवृष्टीने बाधित झालेल्या राजापूर तालुक्यातील कोदवली- रानतळे -धारतळे रस्ता, तळवडे पाचल पूल आणि अणुस्कुरा घाट दुरुस्तीसाठी सार्वजनिक ...

राजापूर : अतिवृष्टीने बाधित झालेल्या राजापूर तालुक्यातील कोदवली- रानतळे -धारतळे रस्ता, तळवडे पाचल पूल आणि अणुस्कुरा घाट दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूरकडून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या सुमारे ४८ लाखांच्या प्रस्तावांना दीड महिना उलटला तरी शासनाने मंजुरीच दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या रस्ता व पुलावरून वाहतूक बंद असून, अणुस्कुरा घाटातून धोकादायक परिस्थितीत वाहतूक सुरू आहे.

विकासकामांसाठी निधी आणला अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकून कायमच ‘चमकोगिरी’ करणाऱ्या या लोकप्रतिनिधींना या रस्ता, पूल आणि घाटाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून तातडीने प्रस्ताव मंजूर करून घेऊन निधी आणण्यास कुणी रोखले आहे काय, असा उपरोधिक प्रश्न आता लोक करत आहेत. १३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत राजापूर-कोदवली-रानतळे धारतळे मार्ग पुन्हा खचला आहे. एक बाजू पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक, एस. टी. वाहतूक बंद झाली आहे. लाेकांची गैरसोय लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी आगार प्रशासनाने रानतळे येथून या भागात जाणाऱ्या एस. टी. बस सुरू केल्या आहेत. मात्र राजापूरकडून साखळकरवाडी मार्गे जाणारा मार्ग अत्यंत धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एका एसटीला विद्युतवाहिनी लागल्याने शॉकही लागला होता. सुदैवाने प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

राजापूर-कोदवली-रानतळे धारतळे मार्ग बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर कार्यालयाकडून सुमारे १२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे, मात्र दीड महिना झाला तरी शासनाने या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही.

२३ जुलैच्या अतिवृष्टीत पूर्व भागातील तळवडे पाचल मार्गावरील पूल वाहून गेला आहे. अणुस्कुरा घाटात पाच ते सहा ठिकाणी दरड कोसळून हा रस्ता बंद झाला होता. तळवडे पाचल रस्त्यावरील वाहतूक अद्याप बंद आहे. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे २२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यालाही मंजुरी मिळालेली नाही. या ठिकाणीही एस. टी. व अन्य वाहतूक ठप्प आहे. याचा फटका या भागातील लोकांना बसत आहे. अणुस्कुरा घाटातील दरड तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करून येथे वाहतूक सुरू केली आहे. मात्र घाटात कधीही पुन्हा दरड कोसळण्याचा धोका असून, याच धोकादायक मार्गावरून वाहतूक सुरू आहे. या घाटातील दरड प्रवणक्षेत्र भाग दुरुस्तीसाठी १२ लाखांचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे शासनाकडे पाठविलेला आहे. मात्र तोही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या राजापूर-रानतळे रोड व तळवडे पाचल पुलाचीही तात्पुरती दुरुस्ती करून यावरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ती तात्पुरत्या स्वरूपाची आणि धोकादायक ठरणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार आहेत. मात्र सत्तेत असूनही आपत्ती काळात झालेल्या या दुरवस्थेच्या दुरुस्तीसाठी निधी आणण्यात त्यांना अपयश आले आहे.