शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

बाधित रस्ता दुरुस्तीचे ४६ लाखांचे प्रस्ताव पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

राजापूर : अतिवृष्टीने बाधित झालेल्या राजापूर तालुक्यातील कोदवली- रानतळे -धारतळे रस्ता, तळवडे पाचल पूल आणि अणुस्कुरा घाट दुरुस्तीसाठी सार्वजनिक ...

राजापूर : अतिवृष्टीने बाधित झालेल्या राजापूर तालुक्यातील कोदवली- रानतळे -धारतळे रस्ता, तळवडे पाचल पूल आणि अणुस्कुरा घाट दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूरकडून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या सुमारे ४८ लाखांच्या प्रस्तावांना दीड महिना उलटला तरी शासनाने मंजुरीच दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या रस्ता व पुलावरून वाहतूक बंद असून, अणुस्कुरा घाटातून धोकादायक परिस्थितीत वाहतूक सुरू आहे.

विकासकामांसाठी निधी आणला अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकून कायमच ‘चमकोगिरी’ करणाऱ्या या लोकप्रतिनिधींना या रस्ता, पूल आणि घाटाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून तातडीने प्रस्ताव मंजूर करून घेऊन निधी आणण्यास कुणी रोखले आहे काय, असा उपरोधिक प्रश्न आता लोक करत आहेत. १३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत राजापूर-कोदवली-रानतळे धारतळे मार्ग पुन्हा खचला आहे. एक बाजू पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक, एस. टी. वाहतूक बंद झाली आहे. लाेकांची गैरसोय लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी आगार प्रशासनाने रानतळे येथून या भागात जाणाऱ्या एस. टी. बस सुरू केल्या आहेत. मात्र राजापूरकडून साखळकरवाडी मार्गे जाणारा मार्ग अत्यंत धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एका एसटीला विद्युतवाहिनी लागल्याने शॉकही लागला होता. सुदैवाने प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

राजापूर-कोदवली-रानतळे धारतळे मार्ग बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर कार्यालयाकडून सुमारे १२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे, मात्र दीड महिना झाला तरी शासनाने या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही.

२३ जुलैच्या अतिवृष्टीत पूर्व भागातील तळवडे पाचल मार्गावरील पूल वाहून गेला आहे. अणुस्कुरा घाटात पाच ते सहा ठिकाणी दरड कोसळून हा रस्ता बंद झाला होता. तळवडे पाचल रस्त्यावरील वाहतूक अद्याप बंद आहे. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे २२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यालाही मंजुरी मिळालेली नाही. या ठिकाणीही एस. टी. व अन्य वाहतूक ठप्प आहे. याचा फटका या भागातील लोकांना बसत आहे. अणुस्कुरा घाटातील दरड तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करून येथे वाहतूक सुरू केली आहे. मात्र घाटात कधीही पुन्हा दरड कोसळण्याचा धोका असून, याच धोकादायक मार्गावरून वाहतूक सुरू आहे. या घाटातील दरड प्रवणक्षेत्र भाग दुरुस्तीसाठी १२ लाखांचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे शासनाकडे पाठविलेला आहे. मात्र तोही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या राजापूर-रानतळे रोड व तळवडे पाचल पुलाचीही तात्पुरती दुरुस्ती करून यावरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ती तात्पुरत्या स्वरूपाची आणि धोकादायक ठरणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार आहेत. मात्र सत्तेत असूनही आपत्ती काळात झालेल्या या दुरवस्थेच्या दुरुस्तीसाठी निधी आणण्यात त्यांना अपयश आले आहे.