शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

सात महिन्यांत मद्य तस्करीत ४०० जणांना अटक; ६७१ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : रत्नागिरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि त्या-त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जिल्हाभरात वर्षभरात धडाकेबाज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : रत्नागिरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि त्या-त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जिल्हाभरात वर्षभरात धडाकेबाज कारवाई केली आहे. केवळ ७ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६७१ गुन्हे दाखल झाले असून, चारशे लोकांना अटक करण्यात आली तर ३ कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे. विशेष करून गोवा बनावटीची दारू तस्करी हा कळीचा मुद्दा बनला असून, या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या दारूची तस्करी व हातभट्टीविरोधात मोहीम उघडली आहे. अनेक दिवस ही कारवाई सुरू असून, तस्करांनी त्याचा धसका घेतला आहे. तरीही चोरट्या स्वरूपात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी सुरू असून, ठिकठिकाणी जंगलामध्ये गावठी दारू गाळली जात आहे. त्यामुळे सातत्याने कारवाई करूनदेखील ही समस्या सुटलेली नाही. उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यामध्ये ६७१ गुन्ह्यांपैकी ३९७ वारस गुन्हे, २७४ बेवारस गुन्हे दाखल करून तब्बल ४०० लोकांना अटक करण्याची कामगिरी बजावली आहे. यामध्ये अकरा वाहने जप्त करण्यात आली असून, साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त झाला आहे. १ जानेवारी ते ११ जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

मध्यंतरी चिपळूणमध्ये गोवा बनावटीचे मद्य घेऊन जाणारा ट्रक मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभार्ली घाटात पकडला. यामध्ये कोट्यवधींची दारू हस्तगत करण्यात यश आले. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर चोरट्या पद्धतीने गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी व राजापूरमधील अधिकाऱ्यांकडून सातत्याने ही कारवाई होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य, निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील, शंकर जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील तसेच या खात्यातील त्या-त्या तालक्यातील अधिकाऱ्यांनी या कारवाया यशस्वी केल्या आहेत.

------------------------------

दारूच्या तस्करीसाठी चिपळूण बनतेय मध्यवर्ती केंद्र

गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीसाठी चिपळूण हे मध्यवर्ती केंद्र मानले जात आहे. मुंबई ते गोवा दरम्यानचे मध्यवर्ती ठिकाण, गुहागर-विजापूर रस्ता, कोकण रेल्वे यामुळे चिपळूण हे तस्करीचे केंद्र बनल्याचे पुढे येत आहे. या विभागाने टाकलेल्या अनेक धाडीत चिपळूणमध्येच मोठी कारवाई करण्यात आली आहे. यानंतर खेड, राजापूर तालुक्याचा समावेश आहे. अनेकवेळा चिपळुणातील राष्ट्रीय महामार्गावरून रात्री-अपरात्री या दारूची तस्करी होते, हे आजवर पडलेल्या धाडींतून पुढे येत आहे.

170721\1657img-20210630-wa0019.jpg

मद्य तस्करी: ४०० जणांना अटक; ७ महिन्यात ६७१ गुन्हे दाखल