शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

कसोप येथील गिरणी कामगाराची ३८ वर्षे प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST

रत्नागिरी : कसोप (ता. रत्नागिरी) येथील राजाराम लक्ष्मण शेलार हे मुंबईतील माॅडर्न मिल्स लि. कंपनीमध्ये १८ वर्षे लाईन जाॅबर ...

रत्नागिरी : कसोप (ता. रत्नागिरी) येथील राजाराम लक्ष्मण शेलार हे मुंबईतील माॅडर्न मिल्स लि. कंपनीमध्ये १८ वर्षे लाईन जाॅबर म्हणून कामाला होते. १८ जानेवारी १९८२ रोजी संप झाला. त्यामुळे त्यांना घरी बसावे लागले. या घटनेला ३८ वर्षे उलटून गेली. मात्र, संप मिटल्यानंतर त्यांना मिल्समध्ये १८ वर्षे काम केलेले असूनसुध्दा पुन्हा नोकरीवर घेण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर गिरणी कामगारांसाठी म्हाडांतर्गत देण्यात येणाऱ्या घरासाठी त्यांनी २०१० साली प्रस्ताव पाठवूनही अद्याप त्यांना या घराची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

राजाराम शेलार हे मुंबईतील माॅडर्न मिल्स लि. कंपनीमध्ये १६ जुलै १९६५ ते १७ जानेवारी १९८२ या कालावधीत लाईन जाॅबर म्हणून कामाला होते. १८ जानेवारी १९८२ रोजी संप झाला. हा संप आज ना उद्या मिटेल आणि आपण कामावर जाऊ, या आशेवर ते होते. मात्र, त्यानंतर संप मिटला तरी अद्याप त्यांना याबाबत काहीच कळविण्यात आले नाही. त्यांनी या मिल्समध्ये १८ वर्षे काम केलेले असूनसुध्दा त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आले नाही. संप झालेल्या गोष्टीला आता ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार शासनाने म्हाडांतर्गत गिरणी कामगारांना घरे देण्याचे ठरवले आहे. ही घरे लॉटरी पद्धतीने दिली जाणार आहेत, असे जाहीर करण्यात आले होते. यासाठी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १५ शाखांमधून अर्ज भरण्यात आले होते. त्यानुसार शेलार यांनीही ५ ऑक्टोबर २०१० साली अर्ज केला. परंतु, अजूनही त्यांच्या या अर्जाची दखल घेतली गेलेली नाही. याबाबतही त्यांचा सातत्याने म्हाडाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.

नोकरीच्या प्रतीक्षेत ३८ वर्षे घालविलेले राजाराम शेलार आता म्हाडाच्या घरासाठीही गेल्या दहा वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत.