शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे ३ हजार सेवेकरी चिपळुणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

चिपळूण : श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ३ हजारांवर सेवेकऱ्यांनी गुरुवारी चिपळूणच्या बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबवली. सकाळी ...

चिपळूण : श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ३ हजारांवर सेवेकऱ्यांनी गुरुवारी चिपळूणच्या बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबवली. सकाळी १० ते सायंकाळी ६पर्यंत सर्व गाळ, कचरा उचलून बाजारपेठ चकाचक केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

या मोहिमेत पुणे व सातारा जिल्ह्यातील सेवेकरी सहभागी झाले होते. सकाळी नऊपासून सर्व सेवेकरी चिंचनाका परिसरात एकत्र आले. दहा वाजता आमदार शेखर निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या अभियानाला सुरूवात करण्यात आली. त्यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्याच्या गौरव केला. संस्थानचे हे फार मोठे काम असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी भाजपचे आमदार प्रसाद लाड, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते आदींनी संस्थानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ही मोहीम सुरू असतानाच राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तेथे भेट दिली. त्यांनीही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या या कार्याचे कौतुक केले.

त्यानंतर स्वच्छतेचे काम सुरू झाले. सेवेकऱ्यांची वेगवेगळ्या गटांत विभागणी करण्यात आली व बाजारपेठेतील भाग त्यांना स्वच्छतेसाठी वाटून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सफाई केली. बहाद्दर शेख नाका ते काविळतळी, काविळतळी ते मार्कंडी, मार्कंडी ते नगर परिषद, नगर परिषद ते महालक्ष्मी नगर, शंकरवाडी, चिंचनाका ते पद्या थिएटर, वडार कॉलनी, राहुल गार्डन अशा भागांतील रस्त्यांवर गाळ साचला होता, कचरा पडला होता. तो त्यांनी काढून संपूर्ण स्वच्छता केली.

गाळ व कचरा मोठ्या प्रमाणात पडला असल्याने गेले चार दिवस पावसाची उघडीप मिळूनही पुरेशी स्वच्छता झाली नव्हती. ते समुहानेच व्हायला हवे होते. या पार्श्वभूमीवर संस्थानचे ३००० सेवेकरी येथे दाखल झाले व त्यांनी स्वच्छता केली. त्यांनी एकत्र केलेला कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेने डम्पर व ट्रॅक्टर दिले होते. त्याच्या सहाय्याने सारा कचरा, गाळ, भिजलेले साहित्य उचलण्यात आले. सर्व सेवेकऱ्यांसाठी येथील सेवा समितीतर्फे खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती. २३ जुलैपासून येथे रोज संस्थानचे एक हजार सेवेकरी वेगवेगळ्या भागात स्वच्छता करीत आहेत. अनेक घरे स्वच्छ करण्यास मदत करीत आहेत. पूर ओसरत असताना पहिले दोन दिवस अन्नाची पाकिटे त्यांनी वाटली. त्याचप्रमाणे एक दिवस अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. संस्थानच्या रुग्णवाहिकाही सेवाकार्यात येथे कार्यरत आहेत.