शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रुग्णांची वाढ ; १४ मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

रत्नागिरी : गेल्या दिवसभरात जिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रूग्णांची भर पडली असून सोमवारी १४ काेरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची नोंद ...

रत्नागिरी : गेल्या दिवसभरात जिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रूग्णांची भर पडली असून सोमवारी १४ काेरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयात झाली आहे. रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळू लागला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या २४ तासांच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २५९ नवे रूग्ण नोंदविण्यात आले. यापैकी सोमवारी अँटिजन चाचणीत पाॅझिटिव्ह आलेले रूग्ण ७ तर आरटीपीसीआर चाचणीत २०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. या रुग्णांमध्ये सर्वाधिक ८५ रूग्ण रत्नागिरी तालुक्यातील असून दापोली ११, गुहागर २, चिपळूण ३०, संगमेश्वर २०, मंडणगड १४, लांजा ३६ आणि राजापूर तालुक्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. खेड तालुक्यात एकाही रुग्णाचा समावेश नाही. तसेच या आधीच्या ५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३०,५९५ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या १४ रुग्णांची नोंद झाली असून त्यात आधीच्या ७ रुग्णांचा समावेश असून सोमवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यात ४ आणि गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या तीन तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्याआधीच्या सात मृतांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ५ आणि खेड, रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णसंख्या ३०,५९५ इतकी झाली असून ९२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी १७.१३ टक्के तर मृत्यूचा दर ३.०३ टक्के इतका आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २६० मृत्यूची नोंद झाली असून त्याखालोखाल चिपळूण १८४ आणि संगमेश्वर तालुक्यात १३२ मृत्यूची नोंद झाली आहे.