शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रुग्णांची वाढ ; १४ मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

रत्नागिरी : गेल्या दिवसभरात जिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रूग्णांची भर पडली असून सोमवारी १४ काेरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची नोंद ...

रत्नागिरी : गेल्या दिवसभरात जिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रूग्णांची भर पडली असून सोमवारी १४ काेरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयात झाली आहे. रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळू लागला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या २४ तासांच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २५९ नवे रूग्ण नोंदविण्यात आले. यापैकी सोमवारी अँटिजन चाचणीत पाॅझिटिव्ह आलेले रूग्ण ७ तर आरटीपीसीआर चाचणीत २०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. या रुग्णांमध्ये सर्वाधिक ८५ रूग्ण रत्नागिरी तालुक्यातील असून दापोली ११, गुहागर २, चिपळूण ३०, संगमेश्वर २०, मंडणगड १४, लांजा ३६ आणि राजापूर तालुक्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. खेड तालुक्यात एकाही रुग्णाचा समावेश नाही. तसेच या आधीच्या ५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३०,५९५ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या १४ रुग्णांची नोंद झाली असून त्यात आधीच्या ७ रुग्णांचा समावेश असून सोमवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यात ४ आणि गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या तीन तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्याआधीच्या सात मृतांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ५ आणि खेड, रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णसंख्या ३०,५९५ इतकी झाली असून ९२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी १७.१३ टक्के तर मृत्यूचा दर ३.०३ टक्के इतका आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २६० मृत्यूची नोंद झाली असून त्याखालोखाल चिपळूण १८४ आणि संगमेश्वर तालुक्यात १३२ मृत्यूची नोंद झाली आहे.