शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

भात विक्रीतून राजापुरात २० लाखांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

राजापूर : भातखरेदीच्या शासकीय दरामध्ये झालेल्या वाढीचा फायदा उठवत राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडे १ हजार क्विंटल भात विक्री ...

राजापूर : भातखरेदीच्या शासकीय दरामध्ये झालेल्या वाढीचा फायदा उठवत राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडे १ हजार क्विंटल भात विक्री केली आहे. या भात खरेदी-विक्रीच्या माध्यमातून यावर्षी २० लाख १८ हजार ६५४ रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सुमारे सातशेहून अधिक क्विंटलची जादा भात विक्री झाली आहे.

अवकाळी पाऊस आणि क्यार वादळ यामुळे अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजुरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोट्यात असल्याचे बोलले जाते. पावसाळी हंगामामध्ये राबूनही त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेतीकडे पाठ फिरविली आहे. त्यातून, यापूर्वी हिरवेगार असलेले भातशेतीचे मळे अलीकडे पडीक असल्याचे चित्र दिसत आहे. भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद करून रेशन दुकान तसेच बाजारपेठेतून तांदूळ खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. अशा स्थितीतही काही शेतकरी आजही भातशेती करतानाचे आश्वासक चित्र आहे.

शेतामध्ये पिकणारे भात शासनाकडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकणाऱ्या भातातून उत्पन्न मिळत आहे. यावर्षी आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ त्यामध्ये नद्यांना आलेला पूर यामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले होते. अशा स्थितीमध्ये शासनाच्या भातखरेदीच्या दरामध्ये केवळ अठरा रुपयांची वाढ झाली असलेली तरी, आपद्ग्रस्त स्थितीमध्ये ही वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. याचा फायदा उचलत अनेक शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून भातविक्री केली.

तालुक्यामध्ये राजापूर खरेदी-विक्री संघाच्या पाचल आणि राजापूर येथील केंद्रावर भातखरेदी करण्यात आली.

चाैकट

राजापुरात ४८ शेतकरी ५२२.८५ क्विंटल भात

पाचल येथे ४२ शेतकरी ५७०.८० क्विंटल भात

एकूण १ हजार ९३ क्विंटल भात खरेदी

गतवर्षी ३६७.६० क्विंटल भात खरेदी