शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

दोन कोटी रूपयांनाच लागणार गळती ?

By admin | Updated: December 5, 2015 23:38 IST

ठिबक सिंचन योजना : अर्ज भरण्याचा कालावधी संपला

मेहरुन नाकाडे / रत्नागिरी केंद्र शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ठिबक सिंचन योजना राबविण्याकरिता १ कोटी ९५ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे हे अनुदान परत जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केल्यापासून फळपीक लागवडीला चालना मिळाली. जिल्ह्यात एक लाख ६२ हजार ५४७ हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवड करण्यात आली आहे. डोंगरदऱ्यांमधून हे भौगोलिक क्षेत्र विखुरले आहे. लागवडीनंतर पिकांच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी ठिबक सिंचन फार उपयोगी पडत आहे. जिल्ह्यात ४०० शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. दरवर्षी ३० ते ३५ लाखांचे अनुदान ‘ठिबक’साठी वितरीत करण्यात येते. मात्र, यावर्षी केंद्र शासनाकडून भरघोस निधी जाहीर करण्यात आला. अर्ज भरण्यासाठी १ ते १५ नोव्हेंबरअखेर कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु, दि. १० ते १५ नोव्हेंबरअखेर दिवाळीची सुटी शासकीय कार्यालयांना होती. उर्वरित नऊ दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. दिवाळीनंतर कृषी विभागाकडे २५ अर्ज शेतकऱ्यांनी ठिबकसाठी पाठवले आहेत. मात्र, संबंधित शेतकऱ्यांनी हे अर्ज उशिरा पाठवल्यामुळे ते या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ठिबक योजना आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. ठिबक योजनेकरिता अनुसूचित जाती जमातीसाठी ४५ टक्के, तर खुल्या गटासाठी ३५ टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येते. बदलत्या हवामानामुळे कलमे जगवण्यासाठी शेतकरी ठिबकचा वापर करू लागले आहेत. परंतु, चुकीच्या वेळेत शासनाकडून अर्ज पाठवण्याचा कालावधी जाहीर करण्यात आल्याने आलेला निधी परत जाणार आहे. वास्तविक यावर्षी नोव्हेंबरअखेर भातकापणी सुरू होती. कापणीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्यामुळे ठिबकचे आॅनलाईन अर्ज शेतकरी भरू शकले नाहीत. आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपत असल्यामुळे हा निधी परत जाणार आहे. गेली चार वर्षे कोकणातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे आर्थिक संकटांचा मुकाबला करत आहेत. यावर्षीसुध्दा अद्याप थंडी नसल्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावलेला आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत जाहीर करण्याची मागणी येथील शेतकरीवर्गातून होत आहे. (प्रतिनिधी) अर्ज पडून : कोकणासाठी अट शिथिल करण्याची मागणी शासनाकडून कोणत्याही योजनेसाठी सरसकट कालावधी निश्चित केला जातो. मात्र, कोकणातील बदलते हवामान व भौगोलिक क्षेत्र विचारात घेता कोकणासाठी सरसकट कालावधी निश्चित करण्याची अट शिथिल करून विशिष्ट कालावधी जाहीर करावा. सध्या कृषी विभागाकडे २५ अर्ज शेतकऱ्यांचे पडून आहे. आर्थिक वर्ष समाप्तीपूर्वी पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी कालावधी निश्चित केला तर नक्कीच त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होऊ शकेल. त्यामुळे हा कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.