शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

१८५ अल्पवयीन मुली गेल्या पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातून १८५ अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींचा शोध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातून १८५ अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींचा शोध घेण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. पळून गेलेल्या मुलींपैकी केवळ एका मुलीचा शोध लागलेला नाही.

मुलीचा ओळखीचा मित्र असो किंवा काही वेळा नातेवाईकसुद्धा या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याचे अनेकदा समोर येते. कायद्याने मुली अल्पवयीन असल्यामुळे अशा प्रकारे अपहरण झालेल्या मुलींचा शोध पोलिसांना घ्यावाच लागतो.

२०१८ साली ६६ मुली, २०१९ साली ५४, २०२० साली ३१ मुली पळून गेल्या होत्या. या मुलींना शोधण्यात पोलिसांना १०० टक्के यश आले आहे. २०२१ मध्ये ३४ मुली पळून गेल्या; यापैकी ३३ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले होते. उर्वरित एकीचा शोध लवकर लागेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०१८ ६६

२०१९ ५४

२०२० ३१

२०२१ ३४

मुली चुकतात कुठे?

१) सध्या सोशल मीडियाचा जास्त वापर होऊन त्यामधून ओळख होण्याचे प्रमाण वाढते. त्यातून चॅटिंगचे प्रमाण वाढते व त्यातूनच चुकीचे प्रकार घडतात. कोणतीही खात्री न करता रिवेस्ट स्वीकारू नये. आर्थिक आमिषाला बळी पडतात.

२) अल्पवयीन वयात असलेले आकर्षण. समोरच्याचे वागणे, कपडे पाहून त्याच्याशी ओळख करून मैत्री करावी असे वाटते. या मैत्रीतून आकर्षण निर्माण होऊन पुढे अनैतिक संबंध होतात. मात्र नंतर ते धोका देतात.

३) अल्पवयीन मुलींना चांगल्या - वाईटाची समज नसते. घरातील लोक जे सांगतात ते पटत नसते. घरातील लोकांची किटकिट नको असते. त्यामुळे या वयातील मुलांना बंधनं नको असतात. स्वच्छंदी जगणं हवं असतं व त्यामधूनच पळून जाण्याचे प्रकार घडतात.