शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

१८५ अल्पवयीन मुली गेल्या पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातून १८५ अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींचा शोध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातून १८५ अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींचा शोध घेण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. पळून गेलेल्या मुलींपैकी केवळ एका मुलीचा शोध लागलेला नाही.

मुलीचा ओळखीचा मित्र असो किंवा काही वेळा नातेवाईकसुद्धा या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याचे अनेकदा समोर येते. कायद्याने मुली अल्पवयीन असल्यामुळे अशा प्रकारे अपहरण झालेल्या मुलींचा शोध पोलिसांना घ्यावाच लागतो.

२०१८ साली ६६ मुली, २०१९ साली ५४, २०२० साली ३१ मुली पळून गेल्या होत्या. या मुलींना शोधण्यात पोलिसांना १०० टक्के यश आले आहे. २०२१ मध्ये ३४ मुली पळून गेल्या; यापैकी ३३ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले होते. उर्वरित एकीचा शोध लवकर लागेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०१८ ६६

२०१९ ५४

२०२० ३१

२०२१ ३४

मुली चुकतात कुठे?

१) सध्या सोशल मीडियाचा जास्त वापर होऊन त्यामधून ओळख होण्याचे प्रमाण वाढते. त्यातून चॅटिंगचे प्रमाण वाढते व त्यातूनच चुकीचे प्रकार घडतात. कोणतीही खात्री न करता रिवेस्ट स्वीकारू नये. आर्थिक आमिषाला बळी पडतात.

२) अल्पवयीन वयात असलेले आकर्षण. समोरच्याचे वागणे, कपडे पाहून त्याच्याशी ओळख करून मैत्री करावी असे वाटते. या मैत्रीतून आकर्षण निर्माण होऊन पुढे अनैतिक संबंध होतात. मात्र नंतर ते धोका देतात.

३) अल्पवयीन मुलींना चांगल्या - वाईटाची समज नसते. घरातील लोक जे सांगतात ते पटत नसते. घरातील लोकांची किटकिट नको असते. त्यामुळे या वयातील मुलांना बंधनं नको असतात. स्वच्छंदी जगणं हवं असतं व त्यामधूनच पळून जाण्याचे प्रकार घडतात.