शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

१८५ अल्पवयीन मुली गेल्या पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातून १८५ अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींचा शोध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातून १८५ अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींचा शोध घेण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. पळून गेलेल्या मुलींपैकी केवळ एका मुलीचा शोध लागलेला नाही.

मुलीचा ओळखीचा मित्र असो किंवा काही वेळा नातेवाईकसुद्धा या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याचे अनेकदा समोर येते. कायद्याने मुली अल्पवयीन असल्यामुळे अशा प्रकारे अपहरण झालेल्या मुलींचा शोध पोलिसांना घ्यावाच लागतो.

२०१८ साली ६६ मुली, २०१९ साली ५४, २०२० साली ३१ मुली पळून गेल्या होत्या. या मुलींना शोधण्यात पोलिसांना १०० टक्के यश आले आहे. २०२१ मध्ये ३४ मुली पळून गेल्या; यापैकी ३३ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले होते. उर्वरित एकीचा शोध लवकर लागेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०१८ ६६

२०१९ ५४

२०२० ३१

२०२१ ३४

मुली चुकतात कुठे?

१) सध्या सोशल मीडियाचा जास्त वापर होऊन त्यामधून ओळख होण्याचे प्रमाण वाढते. त्यातून चॅटिंगचे प्रमाण वाढते व त्यातूनच चुकीचे प्रकार घडतात. कोणतीही खात्री न करता रिवेस्ट स्वीकारू नये. आर्थिक आमिषाला बळी पडतात.

२) अल्पवयीन वयात असलेले आकर्षण. समोरच्याचे वागणे, कपडे पाहून त्याच्याशी ओळख करून मैत्री करावी असे वाटते. या मैत्रीतून आकर्षण निर्माण होऊन पुढे अनैतिक संबंध होतात. मात्र नंतर ते धोका देतात.

३) अल्पवयीन मुलींना चांगल्या - वाईटाची समज नसते. घरातील लोक जे सांगतात ते पटत नसते. घरातील लोकांची किटकिट नको असते. त्यामुळे या वयातील मुलांना बंधनं नको असतात. स्वच्छंदी जगणं हवं असतं व त्यामधूनच पळून जाण्याचे प्रकार घडतात.