शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

चाकरमान्यांच्या परतीसाठी आजपासून १६० एसटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

चिपळूण : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चिपळूण आगारातर्फे १६० एसटी बसेसचे नियोजन करण्यात ...

चिपळूण : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चिपळूण आगारातर्फे १६० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. १४ सप्टेंबरपासून या बसेस धावणार आहेत.

गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख उत्सव असल्याने दरवर्षी मुंबई, पुणेसह विविध शहरांतून हजारोंच्या संख्येने चाकरमानी तालुक्यात दाखल होतात. यावर्षीही खासगी वाहनांसह रेल्वे व एसटी बसेसमधून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी शहरासह ग्रामीण भागात दाखल झाले आहेत. दीड दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर काही चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी रेल्वे बरोबरच एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी दरवर्षी चिपळूण आगारातर्फे एसटी बसेसचे नियोजन केले जाते. यावर्षीही आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी १६० एसटी बसेसचे नियोजन केले असून, त्याचे तिकीट आरक्षणही सुरू झाले आहे. पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर मुंबई, पुणेकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढते. त्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले असून १४ सप्टेंबरपासून मुंबई, पुणे मार्गावर या बसेस सोडण्यात येणार आहेत.