शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मँगोनेटमध्ये १,४६० बागायतदार

By admin | Updated: February 13, 2015 22:54 IST

निर्यात वाढणार : युरोपीय देशांनी आंबा आयातीवरील बंदी उठवली...

रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत गतवर्षी युरोपीय देशांनी आंबा नाकारला होता. मात्र, काही अटी शिथील करून युरोपीय देशांनी यावर्षी आंबा आयातीवरील बंदी उठविली आहे. मात्र, शेतकऱ्यांना आंबा परदेशात निर्यात करण्यासाठी कृषी विभागातर्फे मँगोनेटव्दारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १४६० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आंबा बागेचा सातबारा व जागेचा नकाशा याव्दारे आॅनलाईन अर्ज भरून मँगोनेटची नोंदणी करण्यात आली आहे. मँगोनेटसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी दि. २० फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी परदेशात आंबा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना बोलावण्यात येणार असून, ते मार्गदर्शन करणार आहेत. मँगोनेटची प्रक्रिया कशी असते, बागेची पाहणी झाल्यानंतर फळांचे वर्गीकरण तसेच बागेसाठी वापरण्यात आलेली खते, कीटकनाशके यांची नोंदणी कशा पद्धतीने करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये २८ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मँगोनेटसाठी नोंदणी केलेल्या बागेची तपासणी करुन अहवाल तयार करण्यात येणार आहे. संबंधित अहवाल तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना मँगोनेटचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मँगोनेटकडे शेतकऱ्यांचा सध्या वाढता कल असून, दिवसेंदिवस बागांचे क्षेत्र वाढत आहे.युरोपीय देशांमध्ये आंबा पाठवत असताना त्यावर उष्णजल प्रक्रियाही करण्यात येणार आहे. आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सिअस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशर यांसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे.मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. यासंबंधी तातडीने अहवाल पाठविणे गरजेचे असल्याने विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)युरोपीय देशांनी आंबा आयातीवरील बंदी उठवल्याने बागायतदारांना त्याचा फायदा झाला आहे. निर्यातीसाठी यामुळे अनुकूल वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.