शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

चिपळुणात १२ हजार टन कचऱ्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : अख्खी बाजारपेठच २८ ते ३० तास पाण्यात असल्याने सर्व दुकानांमधील विक्रीचे साहित्य खराब झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : अख्खी बाजारपेठच २८ ते ३० तास पाण्यात असल्याने सर्व दुकानांमधील विक्रीचे साहित्य खराब झाले आहे. हे साहित्य, घराघरातून वाहून गेलेल्या गोष्टी आणि पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा ही आता चिपळूणकरांसमोरील खूप मोठी समस्या झाली आहे. आतापर्यंत १५०० टन कचरा उचलण्यात आला असला तरी अजूनही १२ हजार टन कचरा उचलण्याचे आव्हान चिपळूणकरांसमोर आहे. त्यासाठी अहोरात्र काम सुरू असून प्रशासनाच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.

येथे दि. २२ व २३ जुलैला आलेल्या महापुरात चिपळूणचे अतोनात नुकसान झाले. संपूर्ण बाजारपेठ व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. पुरासोबत शहर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आला असून, अजूनही चिखल काढण्याचे काम सुरू आहे. चिखलामुळे साफसफाईच्या कामात अडचणी येत असून, येथील व्यापारी व नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच नगर परिषद सफाई कामगारांनाही चिखल उपसतानाच नाकीनऊ येत आहे. अशा परिस्थितीत काडसिद्धेश्वर सांप्रदाय, आप्पासाहेब धर्माधिकारी संस्थानचे श्री सदस्य तसेच ठाणे महानगर पालिका, मुंबई महानगर पालिका, रत्नागिरी नगर परिषद येथील सफाई कामगार या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

नगर परिषदेच्या ८४ सफाई कामगारांसोबत सुमारे ३ हजार नागरिक सफाईच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्या मदतीला जेसीबी व एकूण ७९ डंपर कचरा उचलण्यासाठी अहोरात्र राबत आहेत. तरीदेखील एकूण कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता अजूनही महिनाभर ही मोहीम राबवावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

आतापर्यंत शहरातील विविध भागातून १५०० टन कचरा उचलण्यात आला असून तो शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पाच्या जागेत नेण्यात आला आहे. तेथे १० एकर जागा उपलब्ध असून आतापर्यंत नेलेल्या कचऱ्याने बहुतांशी भाग व्यापला आहे. त्यामुळे उर्वरित कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी खेर्डी औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागेत कचरा टाकण्याचा विचार केला जात आहे.

सद्यस्थितीत दररोज ४०० टन कचरा उचलला जात आहे. परंतु अजूनही १२ हजार टन कचरा शिल्लक असल्याने ही क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर भागातून आणखी मदत घेण्याचा विचार सुरू आहे. दिवसाला किमान १ हजार टन कचरा उचलला गेला तरच ही परिस्थिती वेळेत नियंत्रणात येऊ शकते. आता पूर ओसरल्याला सहा दिवस झाल्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी वाढू लागली आहे. त्यातून रोगराईचा पसरण्याचा धोका आहे. त्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम व भास्कर जाधव यांच्यामार्फत जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

....................

मोहिमेत मुंबईची मोठी साथ

कचरा उचलण्यासाठी मुंबई व ठाणे महानगर पालिकेचे सफाई कामगार व अधिकारी गेले आठ दिवस येथे सातत्याने राबत आहेत. चिखल हटविण्यासाठी महानगर पालिकेकडून अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्यात आल्या असून, त्याचा चांगला उपयोग होत आहे. भविष्यात या महानगरपालिकांमार्फत आणखी काही यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे.

.................

नागरिकांच्या गर्दीमुळे

साफसफाई मोहिमेत अडथळा

सध्या बाजारपेठेत महापुरात भिजलेला माल व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेरच टेबल मांडून विक्रीसाठी काढला आहे. १०० ते १५० रूपये दराने कपडे, भांडी व अन्य साहित्य विक्रीसाठी ठेवल्याने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे शहरातील मदतकार्यासाठी आलेल्या यंत्रणेला त्रास होऊ लागला आहे. वाहतुक कोंडीमुळे कचऱ्याच्या गाड्यादेखील तासनतास अडकून राहत असल्याने वेळेत कचरा उचलला जात नाही.

आतर्य्तंत उचललेला कचरा

१५०० टन

एकूण कचरा

१२ हजार टन

कचऱ्याची वाहने

७९

सफाई कामगार

८४

स्वच्छतेसाठी लोकसहभाग

३०००