शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

चिपळुणात १२ हजार टन कचऱ्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : अख्खी बाजारपेठच २८ ते ३० तास पाण्यात असल्याने सर्व दुकानांमधील विक्रीचे साहित्य खराब झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : अख्खी बाजारपेठच २८ ते ३० तास पाण्यात असल्याने सर्व दुकानांमधील विक्रीचे साहित्य खराब झाले आहे. हे साहित्य, घराघरातून वाहून गेलेल्या गोष्टी आणि पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा ही आता चिपळूणकरांसमोरील खूप मोठी समस्या झाली आहे. आतापर्यंत १५०० टन कचरा उचलण्यात आला असला तरी अजूनही १२ हजार टन कचरा उचलण्याचे आव्हान चिपळूणकरांसमोर आहे. त्यासाठी अहोरात्र काम सुरू असून प्रशासनाच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.

येथे दि. २२ व २३ जुलैला आलेल्या महापुरात चिपळूणचे अतोनात नुकसान झाले. संपूर्ण बाजारपेठ व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. पुरासोबत शहर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आला असून, अजूनही चिखल काढण्याचे काम सुरू आहे. चिखलामुळे साफसफाईच्या कामात अडचणी येत असून, येथील व्यापारी व नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच नगर परिषद सफाई कामगारांनाही चिखल उपसतानाच नाकीनऊ येत आहे. अशा परिस्थितीत काडसिद्धेश्वर सांप्रदाय, आप्पासाहेब धर्माधिकारी संस्थानचे श्री सदस्य तसेच ठाणे महानगर पालिका, मुंबई महानगर पालिका, रत्नागिरी नगर परिषद येथील सफाई कामगार या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

नगर परिषदेच्या ८४ सफाई कामगारांसोबत सुमारे ३ हजार नागरिक सफाईच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्या मदतीला जेसीबी व एकूण ७९ डंपर कचरा उचलण्यासाठी अहोरात्र राबत आहेत. तरीदेखील एकूण कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता अजूनही महिनाभर ही मोहीम राबवावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

आतापर्यंत शहरातील विविध भागातून १५०० टन कचरा उचलण्यात आला असून तो शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पाच्या जागेत नेण्यात आला आहे. तेथे १० एकर जागा उपलब्ध असून आतापर्यंत नेलेल्या कचऱ्याने बहुतांशी भाग व्यापला आहे. त्यामुळे उर्वरित कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी खेर्डी औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागेत कचरा टाकण्याचा विचार केला जात आहे.

सद्यस्थितीत दररोज ४०० टन कचरा उचलला जात आहे. परंतु अजूनही १२ हजार टन कचरा शिल्लक असल्याने ही क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर भागातून आणखी मदत घेण्याचा विचार सुरू आहे. दिवसाला किमान १ हजार टन कचरा उचलला गेला तरच ही परिस्थिती वेळेत नियंत्रणात येऊ शकते. आता पूर ओसरल्याला सहा दिवस झाल्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी वाढू लागली आहे. त्यातून रोगराईचा पसरण्याचा धोका आहे. त्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम व भास्कर जाधव यांच्यामार्फत जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

....................

मोहिमेत मुंबईची मोठी साथ

कचरा उचलण्यासाठी मुंबई व ठाणे महानगर पालिकेचे सफाई कामगार व अधिकारी गेले आठ दिवस येथे सातत्याने राबत आहेत. चिखल हटविण्यासाठी महानगर पालिकेकडून अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्यात आल्या असून, त्याचा चांगला उपयोग होत आहे. भविष्यात या महानगरपालिकांमार्फत आणखी काही यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे.

.................

नागरिकांच्या गर्दीमुळे

साफसफाई मोहिमेत अडथळा

सध्या बाजारपेठेत महापुरात भिजलेला माल व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेरच टेबल मांडून विक्रीसाठी काढला आहे. १०० ते १५० रूपये दराने कपडे, भांडी व अन्य साहित्य विक्रीसाठी ठेवल्याने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे शहरातील मदतकार्यासाठी आलेल्या यंत्रणेला त्रास होऊ लागला आहे. वाहतुक कोंडीमुळे कचऱ्याच्या गाड्यादेखील तासनतास अडकून राहत असल्याने वेळेत कचरा उचलला जात नाही.

आतर्य्तंत उचललेला कचरा

१५०० टन

एकूण कचरा

१२ हजार टन

कचऱ्याची वाहने

७९

सफाई कामगार

८४

स्वच्छतेसाठी लोकसहभाग

३०००