शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

पाणी योजनेचे काम संथ गतीने

By admin | Updated: November 23, 2015 01:28 IST

खोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात

अमोल पाटील, खालापूरखोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पाणी योजनेचे काम कासवगतीने सुरू असल्याने खोपोलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २००८ मध्ये १५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेली जवाहरलाल नेहरू शहरी पाणीपुरवठा योजना प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ३५ कोटी रूपयांवर गेली आहे. आणखी किमान चार ते सहा महिन्यांचा कालावधी ही योजना पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे खोपोलीकरांना आणखी काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.खोपोली नगरपालिकेने शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन २००८ मध्ये जवाहरलाल नेहरू शहरी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले होते. ही योजना अस्तित्वात आल्यानंतर वीणानगर, अशियाना इस्टेट, काटरंग, मोगलवाडी, भानवज, वर्धमान नगर, साईबाबा नगर, शिळफाटा, हाळ, ताकई, यशवंत नगर या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार होता. शहरातील अन्य भागातही या योजनेमुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार होता. २००८ मध्ये १५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेल्या या योजनेचे काम सुरू झाले. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. काम रखडल्यामुळे ही योजना पूर्ण करण्यासाठी सध्या ३५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.खोपोली शहरात अनेक भागांमध्ये पाणीच येत नसल्याने पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ४० टँकर वापरले जात असल्याची माहिती उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती रमेश जाधव यांनी दिली आहे. पालिकेकडून मुख्य जलवाहिनी टाकल्यानंतर अन्य जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या कामासाठी आणखी किमान चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पालिकेकडून मात्र हे काम लवकर होईल असे सांगितले जात आहे.