शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

पाणी योजनेचे काम संथ गतीने

By admin | Updated: November 23, 2015 01:28 IST

खोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात

अमोल पाटील, खालापूरखोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पाणी योजनेचे काम कासवगतीने सुरू असल्याने खोपोलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २००८ मध्ये १५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेली जवाहरलाल नेहरू शहरी पाणीपुरवठा योजना प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ३५ कोटी रूपयांवर गेली आहे. आणखी किमान चार ते सहा महिन्यांचा कालावधी ही योजना पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे खोपोलीकरांना आणखी काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.खोपोली नगरपालिकेने शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन २००८ मध्ये जवाहरलाल नेहरू शहरी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले होते. ही योजना अस्तित्वात आल्यानंतर वीणानगर, अशियाना इस्टेट, काटरंग, मोगलवाडी, भानवज, वर्धमान नगर, साईबाबा नगर, शिळफाटा, हाळ, ताकई, यशवंत नगर या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार होता. शहरातील अन्य भागातही या योजनेमुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार होता. २००८ मध्ये १५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेल्या या योजनेचे काम सुरू झाले. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. काम रखडल्यामुळे ही योजना पूर्ण करण्यासाठी सध्या ३५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.खोपोली शहरात अनेक भागांमध्ये पाणीच येत नसल्याने पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ४० टँकर वापरले जात असल्याची माहिती उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती रमेश जाधव यांनी दिली आहे. पालिकेकडून मुख्य जलवाहिनी टाकल्यानंतर अन्य जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या कामासाठी आणखी किमान चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पालिकेकडून मात्र हे काम लवकर होईल असे सांगितले जात आहे.