शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

‘एकात्मिक बालविकास’चा कारभार रामभरोसे

By admin | Updated: July 12, 2016 02:51 IST

जिल्ह्यात सुदृढ बालके जन्माला यावीत, तेथे त्यांना पूर्व शालेय शिक्षण मिळावे आणि एक सक्षम पिढी उभी राहावी, यासाठी अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवणारा एकात्मिक

कांता हाबळे,  नेरळजिल्ह्यात सुदृढ बालके जन्माला यावीत, तेथे त्यांना पूर्व शालेय शिक्षण मिळावे आणि एक सक्षम पिढी उभी राहावी, यासाठी अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवणारा एकात्मिक बालविकास विभाग कार्यरत असतो. रायगड जिल्ह््यातील १५ तालुक्यांत लाखोंच्या संख्येने बालके पोषण आहार घेण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये येत असतात. त्या अंगणवाड्या व्यवस्थित चालण्यासाठी तालुका स्तरावर एकात्मिक बालविकास विभागाकडून प्रकल्प अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. आज जिल्ह््यात १५ तालुक्यांपैकी चार तालुक्यांत प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे तीन वर्षांपासून भरलेली नाहीत, तर ११ तालुक्यांतील १२ ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्यांचा पदभार शेजारच्या तालुक्यातील एकात्मिक बालविकासच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे आहे. जिल्ह््यात केवळ पाच प्रकल्प अधिकारी असून त्यांच्याकडे अन्य १२ प्रकल्पांचा अतिरिक्त कारभार आहे, म्हणजे संपूर्ण जिल्ह््यातील एकात्मिक बालविकास विभागात बोंबाबोंब आहे.रायगड जिल्ह्यात आणि राज्यात देखील एकात्मिक बालविकास २०१२ पर्यंत ग्रामविकास विभागाचा भाग होता. राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना एकात्मिक बालविकास विभाग ग्रामविकासमधून बाहेर काढून स्वतंत्र विभाग तयार केला. त्यावेळी ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढून एकात्मिक बालविकासमध्ये प्रकल्प अधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामविकास किंवा एकात्मिक बालविकास यापैकी एक पर्याय स्वीकारण्यास सांगितले. त्यावेळी बालविकासमधील बहुतांश अधिकाऱ्यांनी ग्रामविकासचा पर्याय निवडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बालविकास विभागातील प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त झाली. त्या रिक्त जागांवर ५० टक्के पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आणि ४० टक्के पदे बालविकास विभागात कार्यरत मुख्य पर्यवेक्षिका यांना बढती देताना सेवाज्येष्ठतेचा निकष लावण्याचे धोरण जाहीर झाले. मंत्रालय स्तरावर बदली झालेले या दोन्ही विभागांपैकी ग्रामविकास विभागातील सर्व पदे हाऊसफुल झाली. कारण बालविकासमधील अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभाग स्वीकारला होता. त्याचवेळी बालविकासमधील रिक्त पदे भरण्याची कोणतीही तयारी आजपर्यंत शासनाने सुरू केली नाही. बालविकास विभागात सेवाज्येष्ठतेचा निकष पार केलेल्या ४०० हून अधिक मुख्य पर्यवेक्षिका आहेत. त्यांची विभाग स्तरावर सेवाज्येष्ठता देखील २०१३ पासून तयार असताना त्यांना प्रकल्प अधिकारी म्हणून बढती दिली गेली नाही किंवा त्यांच्याकडे प्रकल्प अधिकाऱ्यांचा पदभार देखील सोपविला नाही. सरकायने प्रकल्प अधिकारी पदे न भरल्याने जे प्रकल्प अधिकारी काम करीत आहेत, त्या सर्वांकडे दोनपेक्षा अधिक तालुक्यांचा अतिरिक्त कारभार आहे. रायगड जिल्ह्यात पोलादपूर, पाली, माणगाव, रोहा तालुक्यात बालविकास विभागाला प्रकल्प अधिकारी नाही. त्या त्या पंचायत समितीचे अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांना तेथे प्रभारी प्रकल्प अधिकारी के ले आहे. तर पनवेलमध्ये दोन, तर तळा, श्रीवर्धन आणि उरण अशा चार तालुक्यांत कायमस्वरुपी पाच प्रकल्प अधिकारी आहेत. पनवेल आणि कर्जत तालुक्यात बालविकास चे दोन प्रकल्प निर्माण केले आहेत.