शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

हवामान आधारित विमा योजनेची मागणी

By admin | Updated: May 28, 2017 02:56 IST

कोकण विभागातील पर्जन्यमान खात्रीचे आणि भरपूर असले तरी ‘अतिवृष्टी’ आणि ‘पावसातील खंड’ या दोन कारणास्तव भात (तांदूळ) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते.

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : कोकण विभागातील पर्जन्यमान खात्रीचे आणि भरपूर असले तरी ‘अतिवृष्टी’ आणि ‘पावसातील खंड’ या दोन कारणास्तव भात (तांदूळ) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्याकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत ‘हवामानावर आधारित पीक विमा योजना’ कोकणात अमलात आणावी, अशी मागणी कोकणातील शेतकऱ्यांची आहे. लोकप्रतिनिधींनी या मागणीचा गांभीर्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.नैसर्गिक आपत्ती सदरात अवर्षणाचा विचार सरकारकडून करण्यात येतो; परंतु कोकणातील अतिवृष्टी किंवा पर्जन्यखंड यांचा विचार मात्र होत नाही. कोकणातील शेतकरी दरवर्षी पीक विमा योजनेकरिता कोट्यवधी रुपयांचा हप्ता भरतो; परंतु विमा निकषात कोकणातील शेतकऱ्याची नुकसानी बसत नसल्याने त्यास या विमा योजनेचा कोणत्याही प्रकारे लाभ होत नाही. विद्यमान कृषी विमा योजनेत ७० ते ७५ टक्के नुकसानीचा निकष आहे, तो कोकणाकरिता ९० ते ९५ टक्के करणे अनिवार्य असल्याचे गणित रायगड जिल्ह्यातील जाभिवली येथील प्रयोगशील भात उत्पादक शेतकरी श्रीधर गांगल यांनी मांडले आहे.कोकणात खरीप हंगामात भात हे एकमेव मुख्य पीक असून, या पिकाखाली ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. कोकणातील खरीप भात पिकाकरिता ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ आणि ‘राष्ट्रीय कृषी विमा योजना’ लागू करण्यात आली होती. कोकण विभागातील खात्रीच्या आणि भरपूर पर्जन्यमानामुळे पिकांची प्रतिहेक्टरी उत्पादकता राज्यातील इतर विभागांपेक्षा अधिक असते. या पिकाचे उंबरठा उत्पादन दरवर्षी जास्त आल्यामुळे मागील पाच वर्षांत कोकण विभागातील एकाही शेतकऱ्यांला पीक विमा योजनेचा लाभ मिळू शकला नसल्याचे, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळच्या सावर्डे येथील प्रयोगशील शेतकरी राजाभाऊ राजेशिर्के यांनी यावेळी सांगितले.कोकणात भाताची सरासरी उत्पादकता मुळातच ८० ते ८५ टक्केपेक्षा अधिक आहे; परंतु अतिवृष्टी वा पर्जन्यखंडामुळे भात उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होते. विमा निकष ७० ते ७५ टक्केचा असल्याने त्यात हा शेतकरी बसत नाही. शेतात भात कापणी झाल्यावर ते पावसात भिजून नुकसान होते; परंतु ते पीक विमा योजनेत विचारात घेतले जात नाही आणि शेतकऱ्यास मोठा फटका बसतो, अशी बाजू सिंधुदुर्गमधील कुडाळ येथील अशोक पेडणेकर यांनी मांडली आहे. तर निकषाच्या कारणास्तव शेतकरी योजनेत सहभागी होण्यास उत्सुक नाहीत, अशी माहिती बामणगाव येथील शेतकरी बाळकृष्ण जोशी यांनी दिली आहे.धोक्याचा कालावधी निश्चित करावा- सन २०१४ व २०१५च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत ‘हवामान आधारित पीक विमा योजना’ कोकणातील ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांत राबविण्यात आली होती. - या योजनेअंतर्गत भात पिकासाठी ‘अपुरा पाऊ स’ , ‘पावसातील खंड’ आणि ‘अतिपाऊस’ या हवामान घटकांपासून विमा संरक्षण देण्यात आले होते. त्या वेळी २६ हजार १५९ शेतकरी सहभागी शेतकऱ्यांना एकूण ५ कोटी ४४ कोटी रुपयांची नुकसानभरपाईही मिळाली होती. त्याच योजनेप्रमाणे हवामान धोक्याची प्रमाणके, हवामान धोके कालावधी निश्चित करणे गरजेचे आहे. - ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या मोहिमेअंतर्गत पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक ऱ्यांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना भात पिकासाठी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना लागू करण्यात यावी, अशी मागणी विविध शेतकरी संघाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ‘हवामान आधारित पीक विमा योजना’ शासनस्तरावर विचाराधीन असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.