शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

हवामान आधारित विमा योजनेची मागणी

By admin | Updated: May 28, 2017 02:56 IST

कोकण विभागातील पर्जन्यमान खात्रीचे आणि भरपूर असले तरी ‘अतिवृष्टी’ आणि ‘पावसातील खंड’ या दोन कारणास्तव भात (तांदूळ) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते.

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : कोकण विभागातील पर्जन्यमान खात्रीचे आणि भरपूर असले तरी ‘अतिवृष्टी’ आणि ‘पावसातील खंड’ या दोन कारणास्तव भात (तांदूळ) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्याकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत ‘हवामानावर आधारित पीक विमा योजना’ कोकणात अमलात आणावी, अशी मागणी कोकणातील शेतकऱ्यांची आहे. लोकप्रतिनिधींनी या मागणीचा गांभीर्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.नैसर्गिक आपत्ती सदरात अवर्षणाचा विचार सरकारकडून करण्यात येतो; परंतु कोकणातील अतिवृष्टी किंवा पर्जन्यखंड यांचा विचार मात्र होत नाही. कोकणातील शेतकरी दरवर्षी पीक विमा योजनेकरिता कोट्यवधी रुपयांचा हप्ता भरतो; परंतु विमा निकषात कोकणातील शेतकऱ्याची नुकसानी बसत नसल्याने त्यास या विमा योजनेचा कोणत्याही प्रकारे लाभ होत नाही. विद्यमान कृषी विमा योजनेत ७० ते ७५ टक्के नुकसानीचा निकष आहे, तो कोकणाकरिता ९० ते ९५ टक्के करणे अनिवार्य असल्याचे गणित रायगड जिल्ह्यातील जाभिवली येथील प्रयोगशील भात उत्पादक शेतकरी श्रीधर गांगल यांनी मांडले आहे.कोकणात खरीप हंगामात भात हे एकमेव मुख्य पीक असून, या पिकाखाली ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. कोकणातील खरीप भात पिकाकरिता ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ आणि ‘राष्ट्रीय कृषी विमा योजना’ लागू करण्यात आली होती. कोकण विभागातील खात्रीच्या आणि भरपूर पर्जन्यमानामुळे पिकांची प्रतिहेक्टरी उत्पादकता राज्यातील इतर विभागांपेक्षा अधिक असते. या पिकाचे उंबरठा उत्पादन दरवर्षी जास्त आल्यामुळे मागील पाच वर्षांत कोकण विभागातील एकाही शेतकऱ्यांला पीक विमा योजनेचा लाभ मिळू शकला नसल्याचे, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळच्या सावर्डे येथील प्रयोगशील शेतकरी राजाभाऊ राजेशिर्के यांनी यावेळी सांगितले.कोकणात भाताची सरासरी उत्पादकता मुळातच ८० ते ८५ टक्केपेक्षा अधिक आहे; परंतु अतिवृष्टी वा पर्जन्यखंडामुळे भात उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होते. विमा निकष ७० ते ७५ टक्केचा असल्याने त्यात हा शेतकरी बसत नाही. शेतात भात कापणी झाल्यावर ते पावसात भिजून नुकसान होते; परंतु ते पीक विमा योजनेत विचारात घेतले जात नाही आणि शेतकऱ्यास मोठा फटका बसतो, अशी बाजू सिंधुदुर्गमधील कुडाळ येथील अशोक पेडणेकर यांनी मांडली आहे. तर निकषाच्या कारणास्तव शेतकरी योजनेत सहभागी होण्यास उत्सुक नाहीत, अशी माहिती बामणगाव येथील शेतकरी बाळकृष्ण जोशी यांनी दिली आहे.धोक्याचा कालावधी निश्चित करावा- सन २०१४ व २०१५च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत ‘हवामान आधारित पीक विमा योजना’ कोकणातील ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांत राबविण्यात आली होती. - या योजनेअंतर्गत भात पिकासाठी ‘अपुरा पाऊ स’ , ‘पावसातील खंड’ आणि ‘अतिपाऊस’ या हवामान घटकांपासून विमा संरक्षण देण्यात आले होते. त्या वेळी २६ हजार १५९ शेतकरी सहभागी शेतकऱ्यांना एकूण ५ कोटी ४४ कोटी रुपयांची नुकसानभरपाईही मिळाली होती. त्याच योजनेप्रमाणे हवामान धोक्याची प्रमाणके, हवामान धोके कालावधी निश्चित करणे गरजेचे आहे. - ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या मोहिमेअंतर्गत पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक ऱ्यांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना भात पिकासाठी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना लागू करण्यात यावी, अशी मागणी विविध शेतकरी संघाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ‘हवामान आधारित पीक विमा योजना’ शासनस्तरावर विचाराधीन असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.