शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो

By admin | Updated: November 16, 2016 04:39 IST

राज्य आणि केंद्र सरकारकडे भरपूर पैसा आहे. विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. मुंबई-अलिबाग ‘फास्ट मोटर ट्रान्सपोर्ट’

अलिबाग : राज्य आणि केंद्र सरकारकडे भरपूर पैसा आहे. विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. मुंबई-अलिबाग ‘फास्ट मोटर ट्रान्सपोर्ट’ सुविधा देण्यात येत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. पण त्याच वेळी कोणीही कितीही गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार त्यांना पाठीशी घालणार नाही, असा जाहीर इशारा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी येथे बोलताना दिला.अलिबाग नगरपरिषदेतील गेल्या ३० वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून अलिबाग न.पा.ची सत्ता ताब्यात घेण्याकरिता भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि मनसे अशा चार पक्षांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या अलिबाग शहर संघर्ष समितीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर मधुकर ठाकूर व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री मेहता बोलत होते.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेस नेते माजी आमदार मधुकर ठाकूर, अलिबाग शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.सागर पाटील, भाजपाचे अ‍ॅड.महेश मोहिते, समितीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर मधुकर ठाकूर व सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.पालकमंत्री मेहता म्हणाले की, इतिहास आणि शौर्याची परंपरा असलेल्या अलिबाग शहरात आठवड्याला दोन लाख पर्यटक येतात परंतु त्यांना साधी सुविधा नाही. जिल्ह्याच्या राजधानीचे हे शहर पण गेल्या ३० वर्षांपासून सत्ता असलेल्या शेकापकडे जनतेप्रति कटिबद्धता नसल्याने येथे विकास झाला नाही. विकासाच्या मुद्द्यावर अलिबागच्या नागरिकांनी दिलेल्या संकेतानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सर्व उमेदवारांना येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान करुन अलिबागकर नागरिक निवडून देतील याची खात्री आहे. मी कुठेही असलो तरी सतत अलिबाग शहर संघर्ष समितीबरोबरच असेन आणि अलिबाग शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, असे मेहता यांनी सांगितले.यंदाच्या निवडणुकीत शेकापमुक्त अलिबाग ही घोषणा असल्याचे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले तर निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)