शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची ३० काेटींची याेजना रखडली; धरणात पाणीसाठा असूनही वापर नाहीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 01:31 IST

पेण तालुक्यातील शहापाडा प्राधिकरण योजना

दत्ता म्हात्रेपेण: तालुक्यातील शहापाडा प्राधिकरण योजनेतील ३० काेटी रुपयांची पाणी पुरवठा याेजना रखडली आहे. गेल्या चार वर्षांपासून २७ गावे आणि ४३ वाड्या या पाण्यावाचून वंचित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. प्राधिकरणाकडून काम पूर्ण हाेत नसेल तर मिलिटरीकडून हे काम करावे, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत.

हेटवणे धरणात  विपुल प्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र त्या पाण्याचा एक थेंबभरही वापर या विभागातील ग्रामस्थांसाठी हाेत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही  याेजना मुदतीत पूर्ण करत नसल्याने दिसते आहे.

वाशी, वडखळ विभागाची पाणीटंचाई समस्या कायमची निकाली काढण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाेलले जाते. शहापाडा प्रादेशिक दक्षिण व उत्तर योजना कालबाह्य झाली आहे. उत्तर योजनेतील गावांची तहान भागवण्यासाठी शहापाडा धरणाची क्षमता नाही. त्यासाठी हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणात स्टोरेज करून ते शहापाडा उत्तर योजनेतील २७ गावे ४३ वाड्यांसाठी देणे गरजेचे आहे.  एमएमआरडीएच्या माध्यमातून ३० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम २०१६ साली सुरू झाले.  त्यामधे वाशी नाका ते वढाव गावापर्यंत आठ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जे पाणी शहापाडा धरणात स्टोरेज करण्यासाठी आणायला हवे होते तिथं काम शून्य झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची दूरदृष्टी आणि लोकहिताचे प्राधान्यक्रमाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. ठेकेदाराची अकार्यक्षमता व त्यावर घातलेल्या पांघरुणामुळे हेटवणे धरण उशाला आणि कोरड पडली घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बाेलले जाते. दररोज पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर सगळेच तोंड सुख घेतात. मात्र त्यांच्या शहापाडा धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने कधी पाहणार असा सवाल विचारला जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नीलिमा पाटील अध्यक्षस्थानी असताना ८० लाखाची जी योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेतून सध्या पाणी पुरवठा होत आहे. मात्र तो उत्तर शहापाडा योजनेतील गावांना अपुरा पडत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या लाइनवर असलेले अनधिकृत नळ कनेक्शन यापैकी सहा नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.योजनेतील समोरच्या गावांमध्ये पाणीपुरवठा होतो, तर टोकावरची गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. चार दिवसांनंतर पाचव्या दिवशी पाणी मिळते. त्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे मोर्चे, उपोषणे, आंदोलनचे सध्या पेव फुटले आहे. पेणचे भाजप आमदार तथा माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी यासाठी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासमवेत बैठक घेऊन टँकर लवकर सुरू करावेत, अशी मागणी केली. पेण तहसीलदार, गटविकास अधिकारी, जेएसडब्लू कंपनी यांच्या माध्यमातून तूर्तास पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याची सक्त ताकीद अधिकारी वर्गाला दिली आहे.