शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

पाणीपुरवठ्याची ३० काेटींची याेजना रखडली; धरणात पाणीसाठा असूनही वापर नाहीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 01:31 IST

पेण तालुक्यातील शहापाडा प्राधिकरण योजना

दत्ता म्हात्रेपेण: तालुक्यातील शहापाडा प्राधिकरण योजनेतील ३० काेटी रुपयांची पाणी पुरवठा याेजना रखडली आहे. गेल्या चार वर्षांपासून २७ गावे आणि ४३ वाड्या या पाण्यावाचून वंचित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. प्राधिकरणाकडून काम पूर्ण हाेत नसेल तर मिलिटरीकडून हे काम करावे, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत.

हेटवणे धरणात  विपुल प्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र त्या पाण्याचा एक थेंबभरही वापर या विभागातील ग्रामस्थांसाठी हाेत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही  याेजना मुदतीत पूर्ण करत नसल्याने दिसते आहे.

वाशी, वडखळ विभागाची पाणीटंचाई समस्या कायमची निकाली काढण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाेलले जाते. शहापाडा प्रादेशिक दक्षिण व उत्तर योजना कालबाह्य झाली आहे. उत्तर योजनेतील गावांची तहान भागवण्यासाठी शहापाडा धरणाची क्षमता नाही. त्यासाठी हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणात स्टोरेज करून ते शहापाडा उत्तर योजनेतील २७ गावे ४३ वाड्यांसाठी देणे गरजेचे आहे.  एमएमआरडीएच्या माध्यमातून ३० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम २०१६ साली सुरू झाले.  त्यामधे वाशी नाका ते वढाव गावापर्यंत आठ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जे पाणी शहापाडा धरणात स्टोरेज करण्यासाठी आणायला हवे होते तिथं काम शून्य झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची दूरदृष्टी आणि लोकहिताचे प्राधान्यक्रमाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. ठेकेदाराची अकार्यक्षमता व त्यावर घातलेल्या पांघरुणामुळे हेटवणे धरण उशाला आणि कोरड पडली घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बाेलले जाते. दररोज पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर सगळेच तोंड सुख घेतात. मात्र त्यांच्या शहापाडा धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने कधी पाहणार असा सवाल विचारला जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नीलिमा पाटील अध्यक्षस्थानी असताना ८० लाखाची जी योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेतून सध्या पाणी पुरवठा होत आहे. मात्र तो उत्तर शहापाडा योजनेतील गावांना अपुरा पडत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या लाइनवर असलेले अनधिकृत नळ कनेक्शन यापैकी सहा नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.योजनेतील समोरच्या गावांमध्ये पाणीपुरवठा होतो, तर टोकावरची गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. चार दिवसांनंतर पाचव्या दिवशी पाणी मिळते. त्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे मोर्चे, उपोषणे, आंदोलनचे सध्या पेव फुटले आहे. पेणचे भाजप आमदार तथा माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी यासाठी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासमवेत बैठक घेऊन टँकर लवकर सुरू करावेत, अशी मागणी केली. पेण तहसीलदार, गटविकास अधिकारी, जेएसडब्लू कंपनी यांच्या माध्यमातून तूर्तास पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याची सक्त ताकीद अधिकारी वर्गाला दिली आहे.