शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

जलसंपत्ती भक्कम करणे आवश्यक

By admin | Updated: January 16, 2016 00:28 IST

देशामधील सर्वात जास्त ४० टक्के धरणं महाराष्ट्रात आहेत. पण आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोकणची जलसंपत्ती त्यामानाने

पेण : देशामधील सर्वात जास्त ४० टक्के धरणं महाराष्ट्रात आहेत. पण आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोकणची जलसंपत्ती त्यामानाने चांगली आहे. ही अधिक भक्कम करण्यासाठी पडणाऱ्या पावसाचा थेंबन्थेंब अडवून तो जमिनीत जिरवायचा असेल तर त्यासाठी गावकऱ्यांनी, युवा-युवतींनी, विद्यार्थ्यांनी या कामांसाठी स्वत:हून तयार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन विश्व जलशांती यात्रा अंतर्गत कोकण परिक्रमेचे मुख जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पेण येथील कार्यक्रमप्रसंगी केले.कोकणात उपजत आढळणारी जैवविविधता, दरवर्षी ३०७० मिमीपेक्षा जास्त पडणारा पाऊस, डोंगरदऱ्यांच्या विस्तीर्ण रांगा, लालबुंद माती, ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, निसगाने कोकणावर कृपादृष्टी केली असतानाही कोकणात मागासलेपणा कायम आहे. चांगला पाऊस पडूनसुद्धा वाया जाणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यावर आजपर्यंत भर दिला नाही, असे राजेंद्र सिंह म्हणाले. जंगल, जमीन, प्राणी हे तीन नैसर्गिक घटकांचे महत्त्व मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. भौतिक श्रीमंतीच्या मागे धावाल तर अपणच आपले अहित करतो याचे भान ठेवा. नैसर्गिक घटकांचे संरक्षण करण्याची शपथ घ्या, यातूनच कोकणची प्राकृतिक संपदा बहरेल व त्या अनुषंगाने जगातले अनेक देशोदेशींचे पर्यटक कोकणला, येथील नैसर्गिक वनसंपदेला भेटी देतील. त्यातूनच गावातच तुम्हाला आर्थिक समृद्धीचा भक्कम स्रोत उपलब्ध होईल, असे वक्तव्य डॉ. राणा यांनी केले.कोकण जलपरिक्रमेंतर्गत जलचेतना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन पेणच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्रसिंह यांनी राजस्थान व कोकण यांच्यामधील प्राकृतिक परिभाषा उलगडून फरक स्पष्ट क रताना कोकणातील प्राकृतिक संपदा अनुकूल असूनसुद्धा गावे ओस पडली, लोक शहराकडे गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. नव्या पिढीने शेतीचे ज्ञान घेतले नाही, त्यामुळे चंगळवादात वाढला आहे.यावेळी कोकण परिक्रमेचे प्रमुख संजय यादव, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, बापूसाहेब नेने, डॉ. गोडबोले आदी उपस्थित होते.