शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपत्ती भक्कम करणे आवश्यक

By admin | Updated: January 16, 2016 00:28 IST

देशामधील सर्वात जास्त ४० टक्के धरणं महाराष्ट्रात आहेत. पण आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोकणची जलसंपत्ती त्यामानाने

पेण : देशामधील सर्वात जास्त ४० टक्के धरणं महाराष्ट्रात आहेत. पण आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोकणची जलसंपत्ती त्यामानाने चांगली आहे. ही अधिक भक्कम करण्यासाठी पडणाऱ्या पावसाचा थेंबन्थेंब अडवून तो जमिनीत जिरवायचा असेल तर त्यासाठी गावकऱ्यांनी, युवा-युवतींनी, विद्यार्थ्यांनी या कामांसाठी स्वत:हून तयार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन विश्व जलशांती यात्रा अंतर्गत कोकण परिक्रमेचे मुख जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पेण येथील कार्यक्रमप्रसंगी केले.कोकणात उपजत आढळणारी जैवविविधता, दरवर्षी ३०७० मिमीपेक्षा जास्त पडणारा पाऊस, डोंगरदऱ्यांच्या विस्तीर्ण रांगा, लालबुंद माती, ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, निसगाने कोकणावर कृपादृष्टी केली असतानाही कोकणात मागासलेपणा कायम आहे. चांगला पाऊस पडूनसुद्धा वाया जाणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यावर आजपर्यंत भर दिला नाही, असे राजेंद्र सिंह म्हणाले. जंगल, जमीन, प्राणी हे तीन नैसर्गिक घटकांचे महत्त्व मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. भौतिक श्रीमंतीच्या मागे धावाल तर अपणच आपले अहित करतो याचे भान ठेवा. नैसर्गिक घटकांचे संरक्षण करण्याची शपथ घ्या, यातूनच कोकणची प्राकृतिक संपदा बहरेल व त्या अनुषंगाने जगातले अनेक देशोदेशींचे पर्यटक कोकणला, येथील नैसर्गिक वनसंपदेला भेटी देतील. त्यातूनच गावातच तुम्हाला आर्थिक समृद्धीचा भक्कम स्रोत उपलब्ध होईल, असे वक्तव्य डॉ. राणा यांनी केले.कोकण जलपरिक्रमेंतर्गत जलचेतना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन पेणच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्रसिंह यांनी राजस्थान व कोकण यांच्यामधील प्राकृतिक परिभाषा उलगडून फरक स्पष्ट क रताना कोकणातील प्राकृतिक संपदा अनुकूल असूनसुद्धा गावे ओस पडली, लोक शहराकडे गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. नव्या पिढीने शेतीचे ज्ञान घेतले नाही, त्यामुळे चंगळवादात वाढला आहे.यावेळी कोकण परिक्रमेचे प्रमुख संजय यादव, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, बापूसाहेब नेने, डॉ. गोडबोले आदी उपस्थित होते.