शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

किनारपट्टीवर साचताहेत कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: February 15, 2015 23:43 IST

जागरूकतेची गरज : पर्यटनावर परिणामाची शक्यता; वाढते प्रदूषण मानवी जीवनासह सागरी जीवसृष्टीसही अपायकारक

सावळाराम भराडकर - वेंगुर्ले -कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर येतात निळेशार समुद्रकिनारे, रम्य, शांत वातावरणातील स्वच्छ किनारे, पांढरी शुभ्र वाळू. मात्र, गेल्या काही वर्षांत सागरी प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता कोकणातील किनारपट्टीवर मानवनिर्मित कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही भयावह बाब असून, वाढते प्रदूषण मानवी जीवनासह सागरी जीवसृष्टीसही अपायकारक ठरणार आहे. याबाबत वेळीच जनजागृती व उपाययोजना होणे गरजेचे बनले असून किनारपट्टीवरील स्थानिक जनतेने जागरूक होणे महत्त्वाचे ठरणार आहे. नयनरम्य, निळेशार, स्वच्छ समुद्र किनारे, शुभ्र वाळू यामुळे कोकणातील सागरी किनारे पर्यटकांना भुरळ पाडत होते. मात्र, आजूबाजूच्या परिसरात स्थानिकांकडून टाकण्यात आलेला कचरा ठिकठिकाणच्या नदीनाल्यातून वाहत येऊन किनारपट्टीवर साचला जातो. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर हा कचरा किनारपट्टीवर संपूर्णत: विखुरलेला निदर्शनास येत आहे. यामध्ये काटेरी झुडपे, फाटलेले कपडे, प्लास्टिक पिशव्या, चप्पल, खाण्याच्या वस्तूंची वेष्ठने, डबे, काचेचे बल्ब, ट्युब, काचेच्या बाटल्या, थर्माकॉल, गाड्यांचे टायर, फाटलेली जाळी, दोरखंड, पत्र्याची वस्तू, कुजलेले मासे, तेलाचे तवंग, लाकडी आेंडके व इतर मानवनिर्मित टाकाऊ वस्तू व आता ई-कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यात आता शाळा-महाविद्यालयीन सहली, खेळ, मनोरंजक कार्यक्रम यांचे आयोजन समुद्र किनारी होत असल्याने जेवणासाठी लागणाऱ्या साहित्याचे व तत्सम वस्तू तेथेच टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात जेवणाच्या पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, चमचे, बाटल्या यांचे वाढते प्रमाण निदर्शनास येते, तर पार्ट्यांचे आयोजन समुद्र किनारी होत असल्याने दारूच्या बाटल्या व इतर वस्तू किनारी टाकल्या जातात. किनारपट्टीवरील हे वाढते प्रदूषण मानवी जीवनासह समुद्रातील जीवसृष्टीस घातक ठरत आहे, असे दिसून आले आहे.समुद्रमार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीवेळी अपघात होऊन तेल गळतीने समुद्राच्या पाण्यावर तेलाचे तवंग निर्माण होतात. याचा दुष्परिणाम सागरी जीवसृष्टीवर होतोच, शिवाय हे तवंग किनारी येऊन शुभ्र वाळू काळीकुट्ट बनते व चिकटमय होते. याचा थेट परिणाम स्थानिक जनतसेह मच्छिमार व पर्यटकांवर होतो. मात्र, यात सर्वांत महत्त्वाचे मानव जीवनातील प्लास्टिकचे प्रमाण. कारण प्लास्टिकमुळे कित्येक आरामदायी वस्तू कमीत कमी किमतीत मिळतात व याच वस्तू समुद्रात फेकल्या जातात. वजनाने हलक्या असल्याने त्या दूर अंतरावर वाहून जातात आणि याच वस्तू सागरी जीवसृष्टीस हानिकारक व प्राणघातक ठरत आहेत. असे असूनही दिवसेंदिवस प्लास्टिकचे प्रमाण वाढतच आहे. त्यात अशा वस्तूंच्या विघटनास बराच अवधी लागत असल्याने चौपाटीवर प्लास्टिक जास्त प्रमाणात इतरत्र पसरलेले दिसत आहे. या व अशा विविध कारणांनी आज सागरी प्रदूषण होत आहे. परंतु, सागरी पर्यावरणाच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार होत नसल्याचे दिसून येत आहेत.सेवाभावी संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये यांच्यासह नागररिकांनीही जागरूक होणे गरजेचे आहे. कारण समुद्र केवळ मच्छिमारांसाठीच फायद्याचा नसून, हवा संतुलन, सागरी पर्यावरण, अर्थकारण, व्यापार, दळणवळण व पर्यटनदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. त्याला वाचविण्यासाठी शासनासह जनतेने उपाययोजना आखून किनारी साचलेल्या कित्येक टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पर्यावरणावरही परिणामपर्यटन महामंडळ पर्यटनाचा विचार करून नवनवीन उपाययोजना राबविते. मात्र, इतर उपक्रमांबरोबरच समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याबाबतही गांभीर्याने विचार करून तशा उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. निसर्गाने मुक्त हस्ताने कोकणावर सौंदर्याची उधळण केली आहे, परंतु वाढत्या प्रदूषणाचा विचार करता येथील निसर्ग सौंदर्यामध्ये बाधा येऊ लागली आहे. याचा परिणाम पर्यटनाबरोबरच पर्यावरणही होत आहे. त्यामुळे पर्यावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दंडात्मक कारवाईची गरजआज राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे स्वच्छता केली जाते, त्याचप्रमाणे सागरकिनारे स्वच्छ झाले पाहिजेत. ‘स्वच्छ किनारे’ मोहीम राबवून तसेच किनाऱ्यांवर पर्यटकांच्या वर्दळीच्या ठिकाणी कचरापेट्या ठेवणे आवश्यक आहे.मच्छिमार आजही खराब झालेले मासे समुद्र किनारी फेकून देतात. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा मच्छिमारांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून देऊन, प्रसंगी दंडात्मक कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे.