शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अवचित गडाची तटबंदी भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:29 IST

पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची मागणी; शिवकालीन किल्ला; पावसामुळे नुकसान

रोहा : तालुक्यातील मेढा येथील इतिहासाची साक्ष देणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील ठाण्यांपैकी महत्त्वाचे ठाणे म्हणून ओळख असलेल्या अवचित गडाच्या तटबंदीची भिंत कोसळली. तटबंदीची संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळल्याने अवचित गडाकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची व ही तटबंदी पूर्ववत बांधून किल्ला सुरक्षित करण्याची मागणी गडकिल्ले गडप्रेमी व इतिहासप्रेमींनी केली आहे.गेले १५ दिवस रोहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे गडाच्या डाव्या बाजूची संरक्षण भिंत कोसळली आहे. रोह्यातील शिवशंभो प्रतिष्ठान हे गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी पावसाळी, उन्हाळी व हिवाळी ऋतूत आपल्या आसपासच्या परिसरातील अवचितगड, घोसाळगड आणि चणेरा येथील बिरवाडी किल्ला येथे नेहमीच स्वच्छता करण्यासाठी जात असतात. या वर्षीही शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी गडाची स्वच्छता करण्यासाठी गडावर फेरफटका मारला असता या गडप्रेमींच्या निदर्शनास आले, त्यामुळे या गंभीर गोष्टीकडे पुरातत्त्व खात्याने अवचितगडाची पाहणी करून ही तटबंदी भिंत बांधून हा इतिहासाचा ठेवा जतन करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया गडप्रेमींनी दिली.अवचित गड, घोसाळगड, बिरवाडी या किल्ल्यांवर गेली काही वर्षे सातत्याने गड किल्ले संवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.खऱ्या अथाने गड-किल्ल्यांचे संवर्धन पुरातत्व विभागाने करायचे आहे; परंतु रायगड किल्ल्यासारखे मोठे महत्त्वाचे काही किल्ले सोडले तर अन्य किल्ल्यांवर पुरातत्त्व विभाग देखभाल करताना दिसत नाही. अवचित गडाची भिंत तटबंदी पूर्ववत बांधण्याची मागणी पर्यटक, नागरिकांकडून होत आहे.