शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

शेतकऱ्याला प्रतीक्षा सिंचनाच्या पाण्याची

By admin | Updated: November 27, 2015 02:16 IST

खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात.

पेण : खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात. रब्बी हंगाम शंभर टक्के पीक देणारा फायदेशीर हंगाम असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक घेण्याची अधिक ओढ असते. या वर्षीचा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने रब्बीची मशागत करणारा शेतकरी सिंचनाच्या पाणी प्रतीक्षेत आहे. रब्बीत भातशेतीच्या बरोबरीने भाजीपाला, नगदी पिके, कडधान्य, कलिंगड व फूलशेती अशा प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर कृषी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला लघुपाटबंधारे विभाग सिंचनाचे पाणी पाटात कधी सोडणार याची प्रतीक्षा आहे. पेणमधील हेटवणे सिंचन प्रकल्पाअंतर्गत २६८ हेक्टर क्षेत्रावर धरण परिसरात रब्बी हंगामात शेती केली जाते. हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा असल्याने उन्हाळी शेतीसाठी हेटवणे धरण प्रकल्प संस्था शेतीला पाणी सोडते मात्र पाणी कधी सोडले जाणार याची तारीख सिंचन विभागे निश्चित केली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.यावर्षी हेटवणे परिसरातील रब्बी हंगामाची तयारी म्हणून शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात या परिसरातील शेतकऱ्यांना हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजवा तीर कालव्यातून १४ डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येते, मात्र हेटवणे जलसंधारण कालवा विभागाकडून शेतकऱ्यांना या वर्षीचे शेतीसाठी पाणी सोडण्याची तारीख आजपर्यंत सिंचन विभागाने जाहीर केली नाही. या परिसरातील शासनाचे स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील यांच्याकडेही शेतीसाठी पाणी सोडणार याबाबतची माहिती दिलेली नाही.हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा आहे. सबंध कोकण विभागातील लघुपाटबंधारे व मध्यम प्रकल्पात ८३ टक्के पाणीसाठा आहे. सिंचनाचे पाणी शेतीला देण्यास काहीही अडचण नाही. मात्र जलसंधारण विभागाने सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळणार की नाही याबाबत सूचित केलेले नाही.