शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शेतकऱ्याला प्रतीक्षा सिंचनाच्या पाण्याची

By admin | Updated: November 27, 2015 02:16 IST

खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात.

पेण : खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात. रब्बी हंगाम शंभर टक्के पीक देणारा फायदेशीर हंगाम असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक घेण्याची अधिक ओढ असते. या वर्षीचा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने रब्बीची मशागत करणारा शेतकरी सिंचनाच्या पाणी प्रतीक्षेत आहे. रब्बीत भातशेतीच्या बरोबरीने भाजीपाला, नगदी पिके, कडधान्य, कलिंगड व फूलशेती अशा प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर कृषी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला लघुपाटबंधारे विभाग सिंचनाचे पाणी पाटात कधी सोडणार याची प्रतीक्षा आहे. पेणमधील हेटवणे सिंचन प्रकल्पाअंतर्गत २६८ हेक्टर क्षेत्रावर धरण परिसरात रब्बी हंगामात शेती केली जाते. हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा असल्याने उन्हाळी शेतीसाठी हेटवणे धरण प्रकल्प संस्था शेतीला पाणी सोडते मात्र पाणी कधी सोडले जाणार याची तारीख सिंचन विभागे निश्चित केली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.यावर्षी हेटवणे परिसरातील रब्बी हंगामाची तयारी म्हणून शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात या परिसरातील शेतकऱ्यांना हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजवा तीर कालव्यातून १४ डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येते, मात्र हेटवणे जलसंधारण कालवा विभागाकडून शेतकऱ्यांना या वर्षीचे शेतीसाठी पाणी सोडण्याची तारीख आजपर्यंत सिंचन विभागाने जाहीर केली नाही. या परिसरातील शासनाचे स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील यांच्याकडेही शेतीसाठी पाणी सोडणार याबाबतची माहिती दिलेली नाही.हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा आहे. सबंध कोकण विभागातील लघुपाटबंधारे व मध्यम प्रकल्पात ८३ टक्के पाणीसाठा आहे. सिंचनाचे पाणी शेतीला देण्यास काहीही अडचण नाही. मात्र जलसंधारण विभागाने सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळणार की नाही याबाबत सूचित केलेले नाही.