शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

मतदार ओळखपत्रांचा ‘आधार’ हरपला

By admin | Updated: October 17, 2015 02:04 IST

जिल्ह्यातील सुमारे २१ लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर मतदार ओळखपत्रांना जोडला होता. मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा निवडणूक

आविष्कार देसाई, अलिबागजिल्ह्यातील सुमारे २१ लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर मतदार ओळखपत्रांना जोडला होता. मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा निवडणूक यंत्रणेने हा कार्यक्रम आता गुंडाळला आहे. सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणेला वेठीस धरण्याबरोबरच मतदारांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागल्याने नाराजीचा सूर आहे.सरकारने विविध योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने आधार कार्ड काढण्याच्या कामाला गती आली होती. नागरिकांना आधार कार्ड सक्तीचे करता येणार नाही, असे आदेश काहीच दिवसांपूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सरकारची चांगलीच गोची झाली आहे. गॅस सिलिंडरच्या सबसिडीसाठी, घरकुल योजना, रेशनिंगसाठी अशा विविध योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले होते. मात्र आधार कार्ड नोंदणी करण्याचे काम संथगतीने सुरू होते. मतदार ओळखपत्रांना आधार कार्डचा नंबर जोडण्याचे सक्तीचे केल्याने रायगड जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने आलेल्या फतव्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तालुकास्तरावर त्यासाठी कार्यक्रमही आखले. प्रशासनाने आवाहन केल्याने त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २१ लाख मतदार आहेत. एवढे मोठे आवाहन प्रशासनाला पेलायचे होते. प्रशासनाने कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर निवडणूक ओळखपत्राला जोडला आहे. उर्वरित १६ लाख मतदारांचा आधार नंबर मतदान ओळखपत्राला जोडण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर आधार कार्डचा नंबर मतदान ओळखपत्रांना जोडण्याचा कार्यक्रम थांबवावा, असे आदेश सरकारने निवडणूक विभागाला दिले.