शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

मतदार ओळखपत्रांचा ‘आधार’ हरपला

By admin | Updated: October 17, 2015 02:04 IST

जिल्ह्यातील सुमारे २१ लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर मतदार ओळखपत्रांना जोडला होता. मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा निवडणूक

आविष्कार देसाई, अलिबागजिल्ह्यातील सुमारे २१ लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर मतदार ओळखपत्रांना जोडला होता. मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा निवडणूक यंत्रणेने हा कार्यक्रम आता गुंडाळला आहे. सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणेला वेठीस धरण्याबरोबरच मतदारांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागल्याने नाराजीचा सूर आहे.सरकारने विविध योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने आधार कार्ड काढण्याच्या कामाला गती आली होती. नागरिकांना आधार कार्ड सक्तीचे करता येणार नाही, असे आदेश काहीच दिवसांपूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सरकारची चांगलीच गोची झाली आहे. गॅस सिलिंडरच्या सबसिडीसाठी, घरकुल योजना, रेशनिंगसाठी अशा विविध योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले होते. मात्र आधार कार्ड नोंदणी करण्याचे काम संथगतीने सुरू होते. मतदार ओळखपत्रांना आधार कार्डचा नंबर जोडण्याचे सक्तीचे केल्याने रायगड जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने आलेल्या फतव्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तालुकास्तरावर त्यासाठी कार्यक्रमही आखले. प्रशासनाने आवाहन केल्याने त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २१ लाख मतदार आहेत. एवढे मोठे आवाहन प्रशासनाला पेलायचे होते. प्रशासनाने कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर निवडणूक ओळखपत्राला जोडला आहे. उर्वरित १६ लाख मतदारांचा आधार नंबर मतदान ओळखपत्राला जोडण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर आधार कार्डचा नंबर मतदान ओळखपत्रांना जोडण्याचा कार्यक्रम थांबवावा, असे आदेश सरकारने निवडणूक विभागाला दिले.