शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

रुंदीकरणात विजेच्या खांबांचा अडथळा

By admin | Updated: May 19, 2017 03:56 IST

शहरातील रस्ता रुंदीकरणात विजेचे पोल अडथळे ठरत असून त्याचा त्रास पादचारी व वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे रुंदीकरणात अडथळा ठरणारे रस्त्याच्या मधोमध

- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : शहरातील रस्ता रुंदीकरणात विजेचे पोल अडथळे ठरत असून त्याचा त्रास पादचारी व वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे रुंदीकरणात अडथळा ठरणारे रस्त्याच्या मधोमध आणि कडेला असणारे वीज खांब हटविण्याची मागणी नागरिकांडून होत आहे. नेरळ शहरात एमएमआरडी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे २२ कोटी रु पयांची रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे आरसीसी काँक्रीटीकरण करून आठ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. काही भागात ही कामे सुरू असली तरी संथ गतीने पूर्ण होत आहेत. नेरळ बाजारपेठेतील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहेत. मात्र या रस्त्यावर वीज खांब मधोमध असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या संदर्भात माहिती घेतली असता, शहरातील बाजारपेठेत भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहे. रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी जागा सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही भागात नव्याने विजेचे खांब उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे ३५ लाख रु पयांची तरतूद आहे, परंतु हे काम अद्याप सुरू झालेले नाही. काही वीज खांबावर झाडेझुडपे वाढल्याने शॉर्टसर्किटची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.रस्त्यावरील पोल हटविण्याचे काम जिल्हा परिषद करणार आहे. त्यासाठी मंजूर निधीच्या दीड टक्के निधी यासाठी वापरण्यात येणार आहे. यातील काही वीजवाहिन्या जमिनीखालून टाकण्यात येणार आहे, तर काही नव्याने पोल उभारून वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. - मंगेश म्हसकर, ग्रामपंचायत सदस्य, नेरळनेरळ रस्ता रु ंदीकरणात अडथळे ठरणारे विजेचे पोल नेरळ ग्रामपंचायत हटविणार आहे. एमएमआरडीएने हे काम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्याने जिल्हा परिषद नेरळ ग्रामपंचायतीला निधी वर्ग करून विजेचे पोल हटविण्याचे काम करणार आहे.- एन. बी. शिर्के,नेरळ शाखाधिकारी, महावितरण नेरळ रस्ता रु ंदीकरणात अनेक विजेचे पोल अडथळा ठरत आहेत. त्याचा त्रास नेरळकरांना व बाजारात येणाऱ्या नागरिकांना होत आहे, तर अनेक विजेचे पोल झाडाझुडपांनी वेढले आहेत. त्याचाही त्रास मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहे. त्यामुळे हे विजेचे पोल लवकरात लवकर हटविण्यात यावेत, अन्यथा येथे अपघात घडल्यास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल. - सुमित क्षीरसागर, ग्रामस्थ, नेरळ