शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

वर्षासहलीसाठी उरणच्या पीरवाडी बीचला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:59 IST

पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते.

उरण : पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि लगतच्या भागातील पर्यटकांनी आपला मोर्चा उरण परिसरातील आक्कादेवी, पुनाडे, रानसई आदी धरणे आणि नेहमीच आकर्षित करणाºया पीरवाडी बीचकडे वळविला आहे. त्यामुळे सुट्टी आणि वर्षा सहलीचा आनंद लुटणाºया तरुणाईची उरणच्या पर्यटन ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. सध्या रानसई, पुनाडे आदी धरणे ओसंडून वाहू लागली आहेत.>पीरवाडी बीच बनला सेल्फी पॉइंटमुंबईपासून हाकेच्या अंतरावर उरण शहर वसलेले आहे. द्रोणागिरीच्या पायथ्याशी असलेला पीरवाडी बीच पर्यटकांना आकर्षित करीत आहे. बीचवरून दिसणारा समुद्र आणि उधाणाच्या लाटांचे दृश्य कॅमेºयात चित्रित करण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे पीरवाडी बीच आता सेल्फी पॉइंट म्हणूनही आता उदयास येऊ लागला आहे. पीरवाडी बीचबरोबरच द्रोणागिरी किल्ल्यावरही पर्यटकांची गर्दी होत आहे.>रानसई, पुनाडे, आक्कादेवी धरणांचेही आकर्षणउरण परिसरात पावसाची सध्या धुवाधार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीच पर्यटकांना साद घालीत आलेले चिरनेर परिसरातील आक्कादेवी धरणही भरले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. याशिवाय ऐतिहासिक चिरनेर सत्याग्रहातील ठिकाण म्हणूनच आक्कादेवीच्या माळरानाकडे पर्यटक येत असून रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते.