शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वर्षासहलीसाठी उरणच्या पीरवाडी बीचला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:59 IST

पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते.

उरण : पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि लगतच्या भागातील पर्यटकांनी आपला मोर्चा उरण परिसरातील आक्कादेवी, पुनाडे, रानसई आदी धरणे आणि नेहमीच आकर्षित करणाºया पीरवाडी बीचकडे वळविला आहे. त्यामुळे सुट्टी आणि वर्षा सहलीचा आनंद लुटणाºया तरुणाईची उरणच्या पर्यटन ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. सध्या रानसई, पुनाडे आदी धरणे ओसंडून वाहू लागली आहेत.>पीरवाडी बीच बनला सेल्फी पॉइंटमुंबईपासून हाकेच्या अंतरावर उरण शहर वसलेले आहे. द्रोणागिरीच्या पायथ्याशी असलेला पीरवाडी बीच पर्यटकांना आकर्षित करीत आहे. बीचवरून दिसणारा समुद्र आणि उधाणाच्या लाटांचे दृश्य कॅमेºयात चित्रित करण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे पीरवाडी बीच आता सेल्फी पॉइंट म्हणूनही आता उदयास येऊ लागला आहे. पीरवाडी बीचबरोबरच द्रोणागिरी किल्ल्यावरही पर्यटकांची गर्दी होत आहे.>रानसई, पुनाडे, आक्कादेवी धरणांचेही आकर्षणउरण परिसरात पावसाची सध्या धुवाधार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीच पर्यटकांना साद घालीत आलेले चिरनेर परिसरातील आक्कादेवी धरणही भरले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. याशिवाय ऐतिहासिक चिरनेर सत्याग्रहातील ठिकाण म्हणूनच आक्कादेवीच्या माळरानाकडे पर्यटक येत असून रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते.