शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

वर्षासहलीसाठी उरणच्या पीरवाडी बीचला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:59 IST

पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते.

उरण : पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि लगतच्या भागातील पर्यटकांनी आपला मोर्चा उरण परिसरातील आक्कादेवी, पुनाडे, रानसई आदी धरणे आणि नेहमीच आकर्षित करणाºया पीरवाडी बीचकडे वळविला आहे. त्यामुळे सुट्टी आणि वर्षा सहलीचा आनंद लुटणाºया तरुणाईची उरणच्या पर्यटन ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. सध्या रानसई, पुनाडे आदी धरणे ओसंडून वाहू लागली आहेत.>पीरवाडी बीच बनला सेल्फी पॉइंटमुंबईपासून हाकेच्या अंतरावर उरण शहर वसलेले आहे. द्रोणागिरीच्या पायथ्याशी असलेला पीरवाडी बीच पर्यटकांना आकर्षित करीत आहे. बीचवरून दिसणारा समुद्र आणि उधाणाच्या लाटांचे दृश्य कॅमेºयात चित्रित करण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे पीरवाडी बीच आता सेल्फी पॉइंट म्हणूनही आता उदयास येऊ लागला आहे. पीरवाडी बीचबरोबरच द्रोणागिरी किल्ल्यावरही पर्यटकांची गर्दी होत आहे.>रानसई, पुनाडे, आक्कादेवी धरणांचेही आकर्षणउरण परिसरात पावसाची सध्या धुवाधार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीच पर्यटकांना साद घालीत आलेले चिरनेर परिसरातील आक्कादेवी धरणही भरले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. याशिवाय ऐतिहासिक चिरनेर सत्याग्रहातील ठिकाण म्हणूनच आक्कादेवीच्या माळरानाकडे पर्यटक येत असून रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते.