शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

कालव्याचे पाणी चिल्लार नदीत वळवावे

By admin | Updated: June 14, 2016 01:05 IST

तालुक्यात दोन प्रमुख नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. राजनाला कालव्याचे पाणी मालेगावजवळ नवीन कालवा काढून वळविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतल्यास चिल्लार नदी

कर्जत : तालुक्यात दोन प्रमुख नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. राजनाला कालव्याचे पाणी मालेगावजवळ नवीन कालवा काढून वळविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतल्यास चिल्लार नदी परिसरातील २० गावांतील आणि २५ आदिवासी वाड्यांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होऊ शकते. या प्रस्तावाला आदिवासी उपयोजनेतून निधी मिळावा यासाठी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन दिले आहे.चिल्लार नदीचा उगम पेठ किल्ल्याच्या पायथ्याशी झाला आहे. त्या चिल्लार नदीमध्ये पावसाळ्यातील चार महिने वगळता पाणी नसते. त्या भागात सोलनपाडा येथे असलेल्या पाझर तलावातील पाझर पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात असलेल्या कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचून काही प्रमाणात होत असतो. मात्र ही नदी उल्हास नदीला मिळून विसर्जित होत असताना ज्या मार्गातून वाहते, तेथे येईपर्यंत मात्र कोरडी पडते. २० किलोमीटरचा प्रवास करून ही नदी ज्या ठिकाणी वाहते, त्यातील पाऊण भाग हा पावसाळा वगळता कोरडा असतो. त्या संपूर्ण भाग आदिवासी असून, चिल्लार नदी कोरडी असल्याचा फटका त्या परिसरातील आदिवासी लोकांना होत असतो. कारण त्या सर्व गावांत आणि आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दरवर्षी भेडसावत असते.या भागातील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी मालेगावजवळ एक कालवा खोदल्यास आणि त्या कालव्यात राजनाला कालव्याचे पाणी सोडल्यास चिल्लार नदी बारमाही वाहू शकते. राजनाला कालव्याच्या पाण्यावर ठाणे येथील पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. त्यासाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी लक्ष घालावे, यासाठी कर्जत तालुका ठाकूर-कातकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे. तसेच निवेदन संघटनेचे अध्यक्ष जैतू पारधी, माजी अध्यक्ष गोविंद ठोंबरे, ज्येष्ठ नेते वामन ठोंबरे आदींनी दिले आहे. (वार्ताहर)निधी देण्याची मागणी : नदी वाहत असलेला बहुतांश भाग हा आदिवासी उपयोजनेचा भाग असून, आदिवासी विकास खात्याचे मंत्री विष्णू सावरा यांनी पाटबंधारे विभागाला निर्देश देऊन आदिवासी भागातील पाण्याची समस्या कायमची सोडवावी, आवश्यकता असल्यास कालवा काढण्याच्या कामासाठी आदिवासी उपयोजनेकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कर्जत तालुका आदिवसी संघटनेने मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.