शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पर्यटकांना आठवडा बाजारचे आकर्षण

By admin | Updated: January 9, 2016 23:47 IST

निसर्गरम्य वातावरण, नारळी पोकळीच्या बागा, दूरवर पसरलेला समुद्रकिनाऱ्याबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील आठवडा बाजारची भुरळ पडत आहे.

- जयंत धुळप, अलिबागनिसर्गरम्य वातावरण, नारळी पोकळीच्या बागा, दूरवर पसरलेला समुद्रकिनाऱ्याबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील आठवडा बाजारची भुरळ पडत आहे. १३३ वर्षांची प्राचीन आठवडा बाजार सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. १८८३ मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, रेवदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर, आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी आणि महाड तालुक्यात महाडला आठवडा बाजार भरण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागात गरजेपोटी सुरू झालेले हा बाजार तालुक्यांतील विक्रेत्यांकरिता महत्त्वाची बाजारपेठ ठरला आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड ही एक मोठी दैनिक बाजारपेठ आजही सुप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे दर सोमवारी मोठा आठवडा बाजारही भरतो. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रेते आणि १ हजार १०० खरेदीदार येत असत तर हटाळे-नागावच्या आठवडे बाजारात प्रांरभीच्या काळात १५ विक्रेते व १०० खरेदीदार येत असत.१८८१ च्या सुमारास तत्कालीन मुरुड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडे बाजार भरत असे. १८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा आठवडे बाजार भरत असत. काळाच्या ओघात जिल्ह्यातील काही बाजार बंद झाले तर काही ठिकाणी नव्याने आठवडे बाजार सुरू झाले. त्यामध्ये अलिबागजवळच्या वरसोली आणि सहाण या दोन आठवडे बाजारांचा समावेश आहे.आठवडा बाजारातील खरेदीची मौजजिल्ह्यात भरणाऱ्या आठवडे बाजारांपैकी अनेक बाजार हे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी आहेत. तर अनेक बाजार सागरी किनाऱ्यांकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने येथे पर्यटक आवर्जून थांबतात. मॉलच्या तुलनेत आठवडे बाजारात घासाघीस करून माल खरेदी करण्याची मजा काही औरच असल्याचे पिंपरी चिंचवड येथून आलेले आणि हाटाळे-नागांवच्या आठवडे बाजारात खरेदी करणारे दत्ता सरपोतदार यांनी सांगीतले.थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतल्याचा आनंद मॉलमध्ये जे मिळत नाही ते या आठवडे बाजारात मिळते. मातीशी नेमके नाते सांगणारा हा बाजार गावाच्या वातावरणाचा आनंद देतो, अशी प्रतिक्रिया अंधेरीच्या प्रतिभा देव यांनी दिली. शेतकऱ्याच्या हातून तांदूळ, नारळ, वाल, चणे आदी थेट विकत घेताना आनंद आणि समाधान मिळते. शिवाय दलालांऐवजी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळत असल्याने दोन पैसे जास्त देण्याची तयारीही यावेळी असल्याचे अंधेरीच्याच विद्या जावकर यांनी सांगितले.