शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

हजारो बंधारे बांधूनही पाणीटंचाई कायम,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 03:04 IST

रायगड जिल्ह्यात यंदा तब्बल दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ४२ हजार ७० लोकांनी सहभाग नोंदवला. श्रमदानातून बांधलेल्या बंधाºयामुळे १२६.१८ घनमीटर वाहून जाणारे पाणी अडविण्यात यश आले.

- जयंत धुळप अलिबाग : रायगड जिल्ह्यात यंदा तब्बल दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ४२ हजार ७० लोकांनी सहभाग नोंदवला. श्रमदानातून बांधलेल्या बंधाºयामुळे १२६.१८ घनमीटर वाहून जाणारे पाणी अडविण्यात यश आले. त्यामुळे १५ कोटी ४२ लाख ५ हजार रुपयांची बचतही झाली. इतके सर्व सुरळीत असले, तरी येत्या उन्हाळ््यात जिल्ह्याला भीषण पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने आठ कोटी ६३ लाख रुपये खर्चाचा ‘उन्हाळी पाणीटंचाई कृती आराखडा’ तयार करून रायगडच्या जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मंजुरीकरिता पाठविला आहे.गतवर्षी २०१६-१७ च्या आराखड्यात तीव्र पाणीटंचाईग्रस्त असणारे पेण, महाड आणि पोलादपूर हे तीन तालुके यंदाच्या आराखड्यातही तीव्र टंचाईग्रस्त राहाणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसहभागातून पेण तालुक्यात यंदा १२७ वनराई बंधारे बांधून पाणी अडविले असले, तरी या तालुक्यांत ७७ गावे आणि २१४ वाड्या, महाड तालुक्यात २१४ वनराई बंधारे बांधून पाणी अडविले, तरी या तालुक्यात ७८ गावे आणि ३१२ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यात यंदा २२६ वनराई बंधारे बांधून पाणी अडविले असले तरी या तालुक्यात ४५ गावे आणि १९४ वाड्या यंदा संभाव्य तीव्र पाणीटंचाईग्रस्त आहेत.पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांना पारंपरिक पद्धतीनुसार टँकरने जिल्ह्यातील १२३१ गावे व वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन यंदाही करण्यात येत असून, त्यासाठी पाच कोटी ३२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर ५७९ ठिकाणी बोअरवेल्स (विंधण विहिरी) खोदण्यात येणार असून, यासाठी ३ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, बोअरवेल्स खोदण्याचे काम दरवर्षी उशिरा सुरू होत असल्याने पाऊस सुरू झाल्यामुळे या विहिरींचे खादकाम अनेकदा अपूर्णच राहिल्याचा अनुभव आहे.भूजलपातळी खालावण्यास बोअरवेल्स (विंधण विहिरी) हे एक अत्यंत गंभीर कारण आहे. बोअरवेल्स खोदून आणि भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जातो, त्या प्रमाणात वनराई बंधारे वा अन्य कोणत्याही प्रयत्नांतून भूजल पुनर्भरणाचे काम होत नाही, हे गांभीर्याने विचारात घेणे अत्यावश्यक आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये वाढ होत असलयाचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.बोअरवेल्समुळे प्रासंगिक पाणीटंचाईवर मात करणे शक्य होते; परंतु त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत संपुष्टात येत आहेत. भूगर्भजलपातळी वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न आणि उपाय बोअरवेल्स पुढे थिटे पडत आहेत. भूजलपातळी वृद्धिंगत करण्याकरिता गावांजवळच्या वन विभागाच्या जागेतून येणाºया ओढे, नाले, धबधबे यांच्या मार्गात बंधारे बांधून वनतळ््याची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे मत प्रयोगशील शेतकरी महेश्वर देशमुख यांनी व्यक्त केले.महाड तालुक्यातील वाकी-दहिवड या गावांच्या परिसरात तब्बल १०० च्यावर बोअरवेल्स खोदल्या गेल्या आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळी वृद्धिंगत होण्यास किमान ६० ते ७० वर्षांचा कालावधी लागतो; परंतु सततच्या बोरवेल खोदाईमुळे पाणी जिरण्याची नैसर्गिक प्रक्रियाच खंडित केली जात आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नसल्याचे भूगोलतज्ज्ञ तथा पोलादपूर कॉलेज प्राचार्य डॉ. समीर बुटाला यांनी स्पष्ट केले.वाकी-दहिवड या गावांत भूकंपासारखे हादरे बसण्याचा अनुभव गतवर्षी आला. त्यांचाही अभ्यास केला असता, उन्हाळ््यात कोरड्या आणि तप्त झालेल्या बोअरवेल्समध्ये पहिल्या पावसाचे पाणी घुसल्यावर त्या पाण्याची वाफ होते आणि ती बोरवेल्सच्या आत सामावू न शकल्याने, वेगाने बाहेर पडू लागली. त्या वेळी जमिनीतून आवाज आणि भूकंपासारखे धक्के बसले. ही सारी निरीक्षणे शासनाच्या भूवैज्ञानिक आणि भूकंपतज्ज्ञांच्या लक्षात आणून दिली होती; परंतु शासनस्तरावर त्याचे पुढे काय झाले काही कळले नाही. भूगर्भातील जलपातळी वृद्धिंगत करण्याकरिता सत्वर बोअरवेल्स खोदाई थांबविणे अत्यावश्यक आहे.- डॉ. समीर बुटाला, भूगोलतज्ज्ञ

टॅग्स :Raigadरायगड