शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

टँकरने ३६ गावे, १६५ वाड्यांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 02:51 IST

वाढत्या उन्हाळ््याबरोबर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष झपाट्याने वाढत आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस अत्यंत उग्र स्वरूप धारण करीत आहे.

- जयंत धुळप अलिबाग : वाढत्या उन्हाळ््याबरोबर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष झपाट्याने वाढत आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस अत्यंत उग्र स्वरूप धारण करीत आहे. जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाईग्रस्त गाव-वाड्या आराखड्यानुसार जिल्ह्यात ५०८ गावे आणि १ हजार ३०२ वाड्यांमध्ये संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे. जिल्ह्यातील ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने या सर्व ठिकाणी २० टँकर्सच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सद्यस्थितीतील तीव्र पाणीटंचाईग्रस्त ३६ गावे आणि १६५ वाड्यांपैकी सर्वाधिक २१ गावे आणि ६५ वाड्या एकट्या पेण तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत पोलादपूरमध्ये १० गावे व ७१ वाड्या, महाडमध्ये २ गावे व १७ वाड्या, कर्जतमध्ये ३ गावे व ४ वाड्या, रोहा व माणगाव तालुक्यात प्रत्येकी दोन वाड्या आणि श्रीवर्धन तालुक्यात चार वाड्यांमध्ये ही तीव्र पाणीटंचाईआहे.टँकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच विंधण विहिरी करून गावांत पाणी उपलब्ध करून देण्याच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील ७४ गावे व २२१ वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यात येत आहेत. जलस्रोत बळकटीकरण योजनेबरोबरच ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेतून तलाव, बंधारे व धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकून शेतजमिनी कसदार करण्याच्या कामास जिल्ह्यात गती प्राप्त झाली आहे.गतवर्षी जलयुक्त शिवाराची कामे यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील १० गावे संपूर्ण पाणीटंचाईमुक्त झाल्याने यंदा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर्स द्यावे लागले नसल्याचे सूर्यवंशी यांनी पुढे सांगितले.कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कोकणचा समावेश पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत करण्यात आला नव्हता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाउंडेशनचे प्रमुख अमीर खान यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या सभेत जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी रायगडमधील पाणीटंचाई लक्षात आणून दिले.त्यानंतर रायगडमध्ये प्री-वॉटर कपचे आयोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यांतील १४ गावांमध्ये ‘प्री-वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात या सर्व गावांतील ग्रामस्थ सक्रिय सहभागी झाले आहेत. आगामी वर्षी रायगडचा समावेश पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पूर्णपणे असेल, अशी माहिती सूर्यवंशी यांनी पुढेदिली.पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ‘झिंक टँक’ संकल्पनाजिल्ह्यात यंदा ‘झिंक टँक’ संकल्पना प्रथमच राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १७५ वाड्यांमध्ये या झिंक टँक बसविणे प्रस्तावित असून, त्या योगे या वाड्यांमधील उन्हाळी पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या वाडीमध्ये ‘झिंक टँक’ बसविण्यात येईल. त्यामध्ये पावसाळ््यात पावसाचे पडणारे पाणी साठविण्यात येईल. संपूर्ण उन्हाळ््याच्या काळात एक हजार लोकवस्तीला पुरेल इतके पाणी साठविण्याची क्षमता या झिंक टँकची आहे. जलशुद्धीकरण व्यवस्थेतून हे पाणी वाडीवर उपलब्ध होणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगितले.