शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

बक्षिसाच्या रकमेतून पाणी योजना सुरू

By admin | Updated: May 19, 2017 03:53 IST

सरकार आणि प्रशासनाकडे सातत्याने खेटे मारूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्याने काहीजण हतबल होतात. मात्र शिरवली गावातील तरुणांनी

- लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सरकार आणि प्रशासनाकडे सातत्याने खेटे मारूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्याने काहीजण हतबल होतात. मात्र शिरवली गावातील तरुणांनी क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या रकमेतून गावासाठी बंद पडलेली पाणीपुरवठा योजना सुरु केली. अलिबाग तालुक्यातील शिरवली गावातील नवीन वसाहतीमध्ये गेल्याच वर्षी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने त्या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने पाणीपुरवठा बंद पडली होती. योजनेला पुन्हा मूर्त रु प द्यावे यासाठी ग्रामस्थांनी सरकार प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता, परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. अखेरीस शिरवली नवीन वसाहतीतील तरु णांनी पुढाकार घेत क्रिकेट सामन्यांच्या खेळातून मिळविलेल्या पुरस्काराच्या रकमेतून शिरवली नवीन वसाहतीस पाणीपुरवठा सुरु केला. नळयोजनेच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना पूर्णपणे ठप्प पडली होती. त्यामुळे शिरवली नवीन वसाहतीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. याचा महिलांसह मुलांना त्रास होत होता.शिरवली ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्ज व विनंत्या करूनदेखील ही नळयोजना दुरुस्त न करता मंजूर कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम होत असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीला आले होते. अखेर सातविरादेवी क्रि केट संघाने हाशिवरे येथे आयोजित क्रि केट सामन्यांमध्ये जिंकलेल्या पुरस्काराच्या रकमेतून नळ पाणीपुरवठा योजना दु रुस्त केली. यासाठी तरु णांनी श्रमदान देखील केले. पाणीटंचाईच्या काळात तरु णांनी केलेल्या या स्तुत्य कार्याचे कौतुक ग्रामस्थ करत आहेत, तसेच महिलांकडून आनंद व्यक्त होत आहे.