शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

निवडणुकीत आघाडीमुळे शेकापचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:34 IST

जयंत पाटील यांचा घणाघाती हल्ला : झिराड ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे नूतनीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : विधानसभा निवडणुकीत आघाडीमुळे शेकापचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणेच दगा फटका केल्याचा घणाघाती हल्ला शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार पाटील यांनी प्रथमच जाहीर सभेत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. आमदार पाटील यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांच्या असलेल्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.झिराड ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे नूतनीकरण, पाझर तलावाच्या भूमिपूजनासाठी आमदार जयंत पाटील उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून पुन्हा एकदा ग्रामपंचायतींचा विकास करण्यासाठी आम्ही कामाला लागलो असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी नेहमीच आग्रही आहोत. मात्र, आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय दुसरे कोणी तरी लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला नाव न घेता शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना आमदार पाटील यांनी लगावला. आमच्या कालावधीतील एखाद्या विकासकामासाठी निधी मंजूर होऊन त्याची वर्कआॅर्डर आता निघाली असेल तर त्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. मात्र, नागरिकांना विकासकामे कोणी मंजूर करून आणली आणि आतापर्यंत शेकापनेच विकास केला असल्याचे माहीत आहे. त्यामुळे कोणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.मागील निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा एकही मतदार कमी झाला नाही. उलट ग्रामपंचायतीच्या विभागात मतदारांची वाढ झाली आहे. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी असताना काँग्रेसने उमेदवार उभा करूनही त्यांना आपली मत मिळविता आली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे दगा फटका केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत मते आघाडीचे उमेदवार सुभाष उर्फ पंडित पाटील यांना मिळाली असती तर नक्कीच विजय झाला असता, अशी खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली.सध्याचे सरकार हे किती दिवस टिकेल याचा काही नेम नाही. काही दिवसांतच पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार पडले आणि पुन्हा निवडणुका झाल्यास आम्हाला एक संधी मिळून पुन्हा शेकापचा उमेदवार आमदार झालेला पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खा. सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.मंत्रिपद न मिळाल्याने शेकापची नाराजी?महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना मंत्रिमंडळामध्ये आ.जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील एखादे मंत्रिपद दिले जाईल, अशी भाबडी आशा शेकापला होती. खा.सुनील तटकरे यांना २०१९ च्या लोकसभेत निवडून आणण्यात शेकापची महत्त्वाची भूमिका होती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये फक्त १२ सदस्य निवडून आलेले असताना शेकापचे जयंत पाटील यांनी तटकरे यांची मुलगी सध्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना त्या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान केले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुका या आघाडीच्या माध्यमातून लढण्यात आल्या होत्या. त्याचा कमी-अधिक फायदा आघाडीला झाला. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यासाठी स्वत:खा. तटकरे यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, अशी भाबडी आशा शेकापला असल्याचे बोलले जाते.