शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

निवडणुकीत आघाडीमुळे शेकापचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:34 IST

जयंत पाटील यांचा घणाघाती हल्ला : झिराड ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे नूतनीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : विधानसभा निवडणुकीत आघाडीमुळे शेकापचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणेच दगा फटका केल्याचा घणाघाती हल्ला शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार पाटील यांनी प्रथमच जाहीर सभेत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. आमदार पाटील यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांच्या असलेल्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.झिराड ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे नूतनीकरण, पाझर तलावाच्या भूमिपूजनासाठी आमदार जयंत पाटील उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून पुन्हा एकदा ग्रामपंचायतींचा विकास करण्यासाठी आम्ही कामाला लागलो असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी नेहमीच आग्रही आहोत. मात्र, आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय दुसरे कोणी तरी लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला नाव न घेता शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना आमदार पाटील यांनी लगावला. आमच्या कालावधीतील एखाद्या विकासकामासाठी निधी मंजूर होऊन त्याची वर्कआॅर्डर आता निघाली असेल तर त्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. मात्र, नागरिकांना विकासकामे कोणी मंजूर करून आणली आणि आतापर्यंत शेकापनेच विकास केला असल्याचे माहीत आहे. त्यामुळे कोणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.मागील निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा एकही मतदार कमी झाला नाही. उलट ग्रामपंचायतीच्या विभागात मतदारांची वाढ झाली आहे. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी असताना काँग्रेसने उमेदवार उभा करूनही त्यांना आपली मत मिळविता आली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे दगा फटका केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत मते आघाडीचे उमेदवार सुभाष उर्फ पंडित पाटील यांना मिळाली असती तर नक्कीच विजय झाला असता, अशी खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली.सध्याचे सरकार हे किती दिवस टिकेल याचा काही नेम नाही. काही दिवसांतच पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार पडले आणि पुन्हा निवडणुका झाल्यास आम्हाला एक संधी मिळून पुन्हा शेकापचा उमेदवार आमदार झालेला पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खा. सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.मंत्रिपद न मिळाल्याने शेकापची नाराजी?महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना मंत्रिमंडळामध्ये आ.जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील एखादे मंत्रिपद दिले जाईल, अशी भाबडी आशा शेकापला होती. खा.सुनील तटकरे यांना २०१९ च्या लोकसभेत निवडून आणण्यात शेकापची महत्त्वाची भूमिका होती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये फक्त १२ सदस्य निवडून आलेले असताना शेकापचे जयंत पाटील यांनी तटकरे यांची मुलगी सध्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना त्या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान केले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुका या आघाडीच्या माध्यमातून लढण्यात आल्या होत्या. त्याचा कमी-अधिक फायदा आघाडीला झाला. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यासाठी स्वत:खा. तटकरे यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, अशी भाबडी आशा शेकापला असल्याचे बोलले जाते.