शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १५ पैकी सात तालुक्यांत दूषित जलस्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:17 IST

रायगड जिल्ह्याच्या उन्हाळी पाणीटंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २१३३ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई राहणार आहे.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्याच्या उन्हाळी पाणीटंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २१३३ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई राहणार आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ६० गावे आणि २०३ वाड्या अशा एकूण २६३ ठिकाणी प्रत्यक्षात २७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाढत्या उन्हाबरोबरच या टंचाईग्रस्त ठिकाणांमध्ये दिवसागणिक वाढ होत असतानाच, जिल्ह्यातील ११ टक्के जलस्रोत नमुने दूषित निष्पन्न झाले. पिण्याच्या पाण्याबाबत दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.जिल्ह्यात एकूण ८ हजार २९० जलस्रोत आहेत. या जलस्रोतांतून उपलब्ध होणारे पाणी पिण्याकरिता योग्य आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी या जलस्रोतांतील पाण्याचे नमुने घेवून त्यांची अणुजैविक पाणी चाचणी प्रयोगशाळेत करण्यात येते. त्यात निष्पन्न होणारे दूषित जलस्रोत पिण्याच्या पाण्याकरिता बंद करून त्यांच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक ती प्र्रक्रिया संबंधित ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येते. ही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात येतात व ते पिण्यायोग्य झाले असल्यास ते पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते.जिल्ह्यातील जलस्रोतांचे नमुने घेवून त्यांची प्रयोगशाळेत अणुजैविक चाचणी करण्याचे काम जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा या दोन यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येते. एप्रिल २०१९ मध्ये रायगड जिल्ह्यातील या ८ हजार २९० जलस्रोतांपैकी मुळातच केवळ १०.१२ टक्के म्हणजे ८३९ जलस्रोतांचे नमुने तपासणीकरिता घेण्यात आले होते. त्यापैकी २१८ नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने घेतले होते, त्यातील १८ टक्के म्हणजे ३९ जलस्रोत नमुने दूषित निष्पन्न झाले आहेत. नमुने घेतलेल्या ८३९ जलस्रोत पाणी नमुन्यांपैकी उर्वरित ६२१ नमुने भूजल सर्वेक्षण यंत्रणेने घेतले होते. त्यापैकी ९ टक्के म्हणजे ५५ टक्के जलस्रोत नमुने दूषित निष्पन्न झाले आहेत. दोन्ही यंत्रणांकडून घेण्यात आलेल्या एकूण ८३९ पाणी नमुन्यांपैकी तब्बल ११ टक्के म्हणजे ९४ पाणी नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलादपूर, तळा तालुक्यातील पाणी नमुने घेतलेच नाहीपोलादपूर या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यांत १६० जलस्रोत आहेत तर जलदुर्भिक्ष असलेल्या तळा तालुक्यात ३५१ जलस्रोत आहेत.मात्र या दोन्ही तालुक्यातील जलस्रोतांचे पाणी नमुने एप्रिल महिन्यात तपासणीकरिता घेण्यातच आले नाहीत.या तालुक्यातील जलस्त्रोत पिण्यायोग्य आहेत वा नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही.सात तालुक्यांत १५ ते ५० टक्के जलस्रोत दूषित असल्याचे निष्पन्नरायगड जिल्हा परिषदेच्या अणुजैविक पाणी नमुने तपासणी अहवालानुसार उरण, श्रीवर्धन, पनवेल, म्हसळा, सुधागड, पेण आणि महाड या सात तालुक्यातील जलस्रोत १५ ते ५० टक्के या प्रमाणात दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे.जलसुरक्षकांच्या माध्यमातून दूषित जलस्रोतांचे शुद्धीकरणदूषित निष्पन्न जलस्रोतांचे शुद्धीकरण ग्रामपंचायतींमध्ये तैनात जलसुरक्षकाच्या माध्यमातून करण्यात येते. दूषित जलस्रोतांमध्ये सुयोग्य प्रमाणात टीसीएल पावडरची मात्रा देवून पाणी शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर पाणी शुद्ध व पिण्यायोग्य झाले आहे याची खातरजमा करण्यासाठी जलसुरक्षकांच्या माध्यमातून ओ.टी.टेस्ट केली जाते. ती सकारात्मक आल्यास ते पाणी पिण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येते. दरम्यान, पावसाळ््यापूर्वी व पावसाळ््यानंतर जलस्रोतांच्या शुद्धता खातरजमेकरिता जलस्रोतांचे रासायनिक व जैविक परीक्षण देखील करण्यात येते.- नंदकुमार गायकर,अधीक्षक, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड

टॅग्स :Raigadरायगड