शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा तालुक्यातील सात अंगणवाड्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:14 IST

शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तोंडसुरे, चिखलप, मेंदडी कोळीवाडा, मेंदडी आदिवासीवाडी, रोहिणी, पानवे या गावातील अंगणवाड्यांची परिस्थिती पाहिल्यावर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे.

- अरुण जंगम म्हसळा : शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तोंडसुरे, चिखलप, मेंदडी कोळीवाडा, मेंदडी आदिवासीवाडी, रोहिणी, पानवे या गावातील अंगणवाड्यांची परिस्थिती पाहिल्यावर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे. यापैकी काही अंगणवाड्यांना तडे गेले आहेत. चिमुरडी मुले जीव मुठीत घेऊन अक्षरे गिरवित आहेत.म्हसळा तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे.विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाड्यांकडे स्थानिक प्रतिनिधींसहित प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने असे घडते आहे.पावसाळ्यात अनेक अंगणवाड्यांच्या शेड व छतासाठी बसविलेल्या पत्र्यांमधून पाणी पडत असल्याने अंगणवाडीमध्ये येणाºया अनेक छोट्या बालकांची गैरसोय होत आहे.मात्र या सर्व गोष्टींकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांच्या इमारती खूप जुन्या व जीर्ण झाल्या आहेत.विशेषत: मेंदडी गावातील कोळीवाडा व आदिवासीवाडीवरील इमारती धोकादायक असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील तोंडसुरे या गावातील अंगणवाडीची इमारतच कोसळली असल्याने पर्यायी म्हणून ज्या गावातील घरामध्ये बसविले जाते ते पाहिल्यावर खरोखरच सुरक्षित आहे की नाही अशी कल्पना येते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुरुस्तीचे अथवा पुनर्बांधणीचे सर्व प्रस्ताव अद्यापही धूळखात पडले आहेत.त्यामुळे या मुलांना बसण्यासाठीही व्यवस्थित जागा नाही. अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी एक वर्षापूर्वीच दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे तसेच सदर ग्रामपंचायतीला देवून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही.इमारतीची दुरुस्ती व नव्याने उभारण्याची मागणी होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे.मुख्य पर्यवेक्षिका तसेच बालविकास विस्तार अधिकारी यांनी अनेक वेळा संबंधित धोकादायक अंगणवाड्या असलेल्या ग्रामपंचायतींकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे, तसेच अंगणवाड्यांमध्ये वीज जोडणीसाठीही प्रश्न उपस्थित केले आहेत, परंतु याकडे कोणीही गांभीर्याने विचार करीत नाही.याबाबत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी रेणुका पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी अंगणवाडीच्या इमारतीत मुलांना बसवू नये, असा आदेश दिला आहे. ही इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यांच्या स्तरावर याबाबत कारवाई व्हावी, असे त्यांनी सांगितले.>बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येणाºया मासिक सभेमध्ये याच विषयावर पाठपुरावा करून मंजुरी आणणार आहोत.-मधुकर गायकर, उपसभापती पंचायत समिती म्हसळा>अंगणवाड्यांमधील सेविकांना अतिवृष्टीमध्ये मुलांना सदर इमारतीमध्ये न बसविण्याचे आदेश दिले. गेल्या दोन वर्षांपासून नवीन इमारत बांधणीसाठी प्रस्ताव पाठवला मंजुरी मिळालेली नाही.-रेणुका पाटील, मुख्य पर्यवेक्षिका तसेच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी>सदर धोकादायक अंगणवाड्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले असून सदर बाबतीत पाठपुरावा सुरूआहे.प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास तत्काळ काम सुरू करण्यात येईल.- वाय.एम.प्रभे, गटविकास अधिकारी, म्हसळा पंचायत समिती>मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर प्रकरणांना मंजुरी देण्यात येईल.-अदिती तटकरे, जि.प.अध्यक्षा अलिबाग