शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

रस्ते बांधणीची प्रक्रिया अपूर्ण

By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST

अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. रस्ता बांधण्याची प्रक्रिया पूर्ण न के ल्यानेच

अलिबाग : अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. रस्ता बांधण्याची प्रक्रिया पूर्ण न के ल्यानेच (ट्रिटमेंट अपुरी) रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. पाटील यांनी दिलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पाहणी अहवालात मान्य केले आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजय उपाध्ये आणि किशोर अनुभवणे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत हा अहवाल प्राप्त झाला आहे. याच अहवालाच्या अनुषंगाने रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार धरुन रायगड जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक या सात जणांना प्रतिवादी करुन त्यांच्या विरुद्ध येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असल्याची माहिती अ‍ॅड. अजय यशवंत उपाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग क्षेत्रातील, प्रमुख राज्य मार्ग क्र.४ च्या दर्जाचा ‘अलिबाग-रेवस’, राष्ट्रीय महामार्ग क्र. ८९ दर्जाचा ‘थळ-वायशेत-कार्लेखिंड’, राष्ट्रीय महामार्ग क्र.८९ दर्जाचा ‘पोयनाड-नागोठणे’, प्रमुख राज्य मार्ग क्र.४ च्या दर्जाचा ‘अलिबाग-रेवदंडा’, राष्ट्रीय महामार्ग क्र. ९१ च्या दर्जाचा ‘अलिबाग-रोहा’ आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.३० च्या दर्जाचा ‘चौल-वावे-बेलोशी’ या सहा प्रमुख रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पाहणीचा अहवाल अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी.पाटील यांनी दिला आहे. या रस्त्यांवरुन रस्त्याच्या वहन क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहू वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदाच्या पावसाळ््यात जुलै २०१६ मध्ये २० दिवसांच्या कालावधीत ९६ टक्के अतिवृष्टी झाली तर रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांच्या फाद्यांवरुन सतत पाण्याचे थेंब रस्त्यावर पडत राहिल्याने खड्डे पडल्याचे पाहणीत आढळून आले आहे. अवजड वाहनांची वाहतूक अतिवृष्टी आणि रस्त्याला दिलेली ट्रिटमेंट अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. - सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.अजय उपाध्ये, किशोर अनुभवणे यांनी दाखल केलेल्या दाव्यात रस्ते मुदतीत दुरुस्त केले नाहीत तर प्रतिवादींचे दरमहा वेतन रोखून धरावे, जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत रोड टॅक्स घेवू नये अशी विनंती न्यायालयास केली. या दाव्याची सुनावणी २२ आॅक्टोबरला आहे.