शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

नद्या, तलावांनी गाठला तळ

By admin | Updated: May 25, 2016 04:36 IST

पावसाच्या पाण्याचे वेळीच नियोजन न केल्याने रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे अनेकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

- कांता हाबळे, नेरळ

पावसाच्या पाण्याचे वेळीच नियोजन न केल्याने रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे अनेकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अन्य तालुक्याच्या तुलनेत कर्जत तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. परंतु पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने पावसाचे सर्व पाणी वाहून जाते. शासनाने काही प्रमाणात जलसंधारणसारख्या योजना राबवून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना फारसे यश न आल्याचे या भीषण पाणीटंचाईवरून दिसून येत आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील तलाव, धरणे, नद्या आणि पाझर तलावाच्या पातळीत कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील विहिरी, बोअरवेल, नळपाणी योजना यांच्यावर झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.कर्जत तालुक्यात खांडस, वरई-अवसरे, जामरु ख, अंभेरपाडा, कशेळे अशा अनेक ठिकाणी पावसाचे पाणी अडवून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मध्यमातून पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच खांडपे, डोंगरपाडा आणि बलिवरे येथे जिल्हा परिषदेने लघु पाटबंधारे प्रकल्प यांची उभारणी सुरु केली. या पाझर तलावांचे पाणी शेतीला सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. तर राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने पाली-भूतिवली आणि पाषाणे या ठिकाणी उच्च स्तरावर लघुपाटबंधारे प्रकल्प उभारून पावसाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र मागील वर्षीच्या पावसाळ्यात पडलेले कमी पर्जन्य यामुळे कर्जत तालुक्यातील पाणीसाठा करणाऱ्या अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्प यांच्यातून खाली नाल्यामध्ये किंवा नदीमध्ये सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत असून या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी पाझर तलाव आणि पाटबंधारे प्रकल्प यातील धरणाच्या जलाशयात यापुढे पाणीपुरवठा योजनांची उद्भव विहीर बांधली तर भविष्यात नळपाणी योजनांचे पाणी संपणार नाही. अशी नळपाणी योजना पाणीपुरवठा विभागाने राबविली नसल्याने आता अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. झाडे आणि वनराईने नटलेल्या कर्जत तालुक्यातील पावसाचे पाणी अडविण्याची मोहीम राज्य सरकार आणि रायगड जिल्हा परिषदेने १९८० च्या दशकात घेतली होती. त्यातून सरकारी धोरणामुळे कर्जत तालुक्याच्या सर्व भागात पाझर तलाव, लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्या माध्यमातून पाणी अडविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. त्यातील सर्व प्रकल्प हे जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यावेळी प्रलंबित होता आणि आजही कायम आहे. शासनाने ज्या नळपाणी योजना राबविल्या त्यातील काही पाणी योजना या पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्पाचा उद्भव म्हणून वापर केला गेला. तालुक्यातील १०० हून अधिक आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. अधिकाऱ्याचे नियोजन चुकले. जर तालुक्यातील सर्व पाणी योजना वेगवेगळ्या भागातील पाझर तलाव,पाटबंधारे प्रकल्प यांच्या जलाशयावर अंतर्भूत करून केल्या असत्या तर आज कर्जत तालुक्याच्या कोणत्याही भागात पाणीटंचाई जाणवली नसती.अनेक नळपाणी योजना बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत.पाझर तलावामधून पाणी खाली सोडण्याचे बंद केले आहे. पाझर तलावामध्ये जो पाणी साठा वाहत नाही, तोच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. त्या पाण्याचा उपयोग फक्त टँकर भरण्यासाठीच होऊ शकतो. साधारणत: २० दिवस हे पाणी पुरवू शकतो.- बी.आर. कांबळे, उप अभियंता, लघु पाटबंधारे विभाग कर्जत