शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:37 IST

कर्जत नगरपरिषदेचे दुर्लक्ष; शाळेजवळील मुख्य नाला बंदिस्त करण्याची मागणी

कर्जत : शहरातील गटारे उघडी असून, या गटारांमध्ये अनेक गाई पडल्या. नागरिकांनी त्यांना बाहेर काढले, तरीही नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. संपूर्ण कर्जत शहराचे पाणी ज्या मुख्य नाल्यातून वाहते त्या नाल्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत ठेवले आहे. बाजारपेठ नगरपरिषद यांच्या बाजूने वाहणारा मुख्य नाला अभिनव ज्ञानमंदिर शाळेच्या शेजारून नदीकडे जातो. या नाल्याचे काम नथुराम हरपुडे यांच्या घरासमोर गेले कित्येक महिने बंद आहे. अभिनव शाळा, शिशुमंदिर, शारदामंदिर, कन्याशाळा, उर्दू शाळा, या शाळांमधील हजारो विद्यार्थी ज्या रस्त्याने चालत जातात, त्या रस्त्यावरील नाला ठेकेदाराने अनेक नागरिकांनी सूचना करूनदेखील बंदिस्त केला नाही.शाळेच्या वेळी या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची गर्दी होते. शाळेत जाणारी लहान बालके जीव मुठीत धरून येथून प्रवास करीत असतात. एखाद्या मुलाचा पाय घसरला किंवा त्याचे दुर्लक्ष झाले तर या सात ते आठ फूट उंच आणि सात फूट रुंद नाल्यात ती मुले पडू शकते. शहरातून वाहून येणारे पाणी याच नाल्यातून जात असल्याने त्याचा प्रवाहसुद्धा जोरात असतो. नाला उंच आणि प्रवाही असल्याने दुर्दैवाने कोणी त्यात पडले तर त्याला तत्काळ काढणे शक्य नाही.हरपुडे यांच्या घरासमोर उघडा असणारा नाला पुढे नदीपर्यंत बंदिस्त आहे. कोणी यात पडले तर तो सरळ नदीतच वाहून जाणार. ४ आॅगस्ट रोजी कर्जत शहरात पुराच्या पाण्याने थैमान घातले होते. हरपुडे यांच्या आॅफिस आणि बंगल्यात फूटभर पाणी शिरले होते. रस्त्यावरून नाल्यात पाणी वाहत असताना रस्ता आणि नाला एकरूप झाला होता. हरपुडे यांच्या घरातील सामान आणि पाणी बाहेर काढण्याकरिता त्यांचे अनेक मित्र त्यांच्या घरी आले होते. याच वेळी ज्येष्ठ नागरिक सीताराम मंडावळे यांना नाला लक्षात न आल्याने ते नाल्याच्या भिंतीपर्यंत आले असता तेथील नागरिकांनी त्यांना ओरडून मागे फिरण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब झाला असता तर मंडावळे त्या नाल्यात पडले असते आणि अनर्थ झाला असता. उल्हासनगर येथील एकच ठेकेदार कर्जतमधील सर्व रस्ते, नाले, गटारे, बिल्डिंग यांची कामे घेतो. त्याच्याकडे खूपच जास्त काम असल्याने कामाचा फार ताण आहे.कामाचे कुठलेही नियोजन नसल्याने त्यांच्या मनाला येईल तसे काम सुरू करतो. नागरिकांची किंवा जाणाऱ्या-येणाºया वाहनांची किती गैरसोय होते याच्याशी त्याला काही देणे-घेणे नसते. अभिनव शाळा, न्यायालय, नागरपरिषदेजवळील काम डिसेंबरपासून सुरू आहे. मुलांना सुट्टी असताना काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे असताना त्या काळात काम केले नाही. सर्व कार्यालयासमोरील रस्ता, नगरपरिषदे शेजारील किंवा कन्याशाळेजवळील रस्ता याचे योग्य त्या प्रकारे नियोजन झाले नाही. आता ५० फुटांचा रस्ता टप्प्याटप्याने केला जात आहे. ठेकेदाराने सर्वांची व्यवस्थित बांधणी केली असल्याने अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी या ठेकेदाराला पाठीशी घालतात असेच काहीसे चित्र आहे. किमान अंशी शाळेजवळील नाले बंदिस्त व्हावेत. लहान मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये एवढीच पालकांची विनंती आहे.