शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साईकोंड येथे उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:00 IST

वस्तुसंग्रहालयासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न । बाराव्या शतकातील शिल्प असल्याचा अंदाज

गिरीश गोरेगावकर 

माणगाव : तालुक्यातील साई गावजवळील साईकोंड येथील एका लहानशा टेकडीवर साधे कौलारू पद्धतीचे शिवमंदिर होते. त्याची खूप पडझड झाली होती. तेथे दर्शनासाठी शिवभक्त जात होते. तेथेच शिवमंदिराजवळ वीरगळ व सतीशिळेसारखे अवशेष होते. नुकतेच या शिवमंदिराचा साईकोंड गावातील ग्रामस्थ व शिवभक्तांनी जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. या जीर्णोद्धारासाठी इमारतीच्या बांधकामासाठी खड्डे खणण्यास सुरुवात केली. त्या वेळी अनेक प्राचीन शिल्प अढळून आले. हे अवशेष बाराव्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज कोकणातील इतिहास आणि संस्कृती यावर अभ्यास करणारे डॉ. अजय धनावडे यांनी व्यक्त केला.

साईकोंड येथील ग्रामस्थांनी त्वरित संपर्क साधून डॉ. अजय धनावडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर डॉ. अजय धनावडे हे आपल्या विशेष पथकासह शिवमंदिर साईकोंड येथे आले. सुमारे १५ दिवस त्यांनी उत्खननाचे काम सुरू ठेवले. त्यानंतर प्राचीन मंदिराचे एक एक अवशेष बाहेर काढण्यात आले. हे अवशेष बाराव्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज धनावडे यांनी व्यक्त केला.साई हे गाव माणगावच्या पश्चिमेस सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. या अवशेषांमध्ये रेखीव कलात्मक मकरप्रणाल, काही सुस्थितीतील असलेले तर काही भग्नावस्थेतील वीरगळ, सतीशिळा, द्वारशाखा, उंबऱ्याचे अवशेष, खांबांचे तळखडे, भग्नावस्थेत असलेले तरी ठसठशीतपणे उठून दिसणारे गजलक्ष्मी शिल्प, सिद्धवीरांच्या प्रतिमा, नंदी, मराठा काळातील गणेश मूर्ती, पालीयाचे स्मृती दगड असे एक नाही अनेक प्राचीन वास्तू अवशेष सापडले. त्यावरून येथे एक प्राचीन मंदिर उभे होते, असा त्यांनी निष्कर्ष काढला.शिलाहार काळात या परिसरात शैव, वैष्णव, शाक्त पंथाचा चांगलाच प्रभाव होता. हे दाखवणारे अनेक पुरावे या परिसरात उपलब्ध झाले आहेत. येथील स्तंभांच्या तळखड्यावर असलेली नृसिंह, महिषासुरमर्दिनी यांची शिल्पे याचीच प्रतीके आहेत. आढळलेले गजलक्ष्मी शिल्प हे समृद्धी व सुबत्तेचे प्रतीक मानावे लागेल. वीरगळ म्हणजे हा प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी, येथील गोधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारला गेलेला स्तंभ होय. शेती आणि गवताळ कुरणे यांनी कृषीसंपन्न तसेच फळफळावळ, झाडेझुडपे तसेच निसर्गरम्य व असलेला हा परिसर दहाव्या शतकानंतर व्यापारामुळे भरभराटीला आला होता. हे ठिकाण समुद्री सपाटीपासून५०० मीटर अंतरावर आहे.‘शिल्पांचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करा’1इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी येथील ग्रामस्थांना या पुरातन अवशेषांचे महत्त्व समजावून सांगितले आणि येथे असलेल्या अवशेषांची हेळसांड होऊ नये तसेच आपला हा वारसा पुढील पिढ्यांसाठी टिकून राहवा म्हणून या मूर्ती-शिल्पांचे एका वस्तुसंग्रहालयात रूपांतर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.2शिवमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थांनी स्वयंभू श्री शंकर मंदिर ट्रस्ट साईकोंड या नावाने एक धर्मादाय संस्था निर्माण केली असून, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना मंदिराजवळच एक दालन उभारून त्यात हे अवशेष संग्रहालय रूपाने जपून ठेवण्याचा निश्चय केला आहे. साईकोंड येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करून दानशूर व इतिहासप्रेमी लोकांनी या संस्थेस उदार हस्ते मदत करावी, असे आवाहन केले आहे.काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या बहिशल विभागाकडून तेथूनच जवळ असलेल्या चांदोरे येथे झालेल्या उत्खननात आढळलेल्या पुरातन अवशेषावरून ही बाब जास्तच स्पष्ट झाली आहे. पूर्वीपासूनच परदेशाशी समुद्रमार्गे सुरू असलेला व्यापार शिलाहार काळातदेखील सुरू होता. त्यामुळेच श्रीवर्धन या बंदरावरून लिंगा किंवा देवघाटाने पठारी प्रदेशात जाणाºया व्यापारीमार्गावर साई हे गाव असल्याने साईगावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असावे.- डॉ. अजय धनावडे, इतिहासआणि संस्कृती अभ्यासकच्साई हे गाव दिघी माणगाव पुणे या महामार्गावर असून, साईकोंड हे केवळ १ किमी अंतरावर वसलेले एक छोटेसे खेडे आहे. शासनाने या प्राचीन अवशेषांची दखल घेऊन त्यांचे संग्रहालय उभारण्यासाठी आर्थिक निधी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.च्ही मागणी पूर्ण झाल्यास या परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन या भागात रोजगारनिर्मिती होईल. या मतदारसंघाच्या आ. आदिती तटकरे या पर्यटन खात्याच्या राज्यमंत्री असल्याने त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड