शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लालफीतशाही ठरते योजनेला मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 07:08 IST

- आविष्कार देसाई  अलिबाग : जलस्वराज्य टप्पा दोनअंतर्गत दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आखलेली २४ कोटी रुपयांची पाऊस पाणी संकलन योजना थंडावली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या लालफीतशाहीमुळे वेळेत निधी वितरीत न झाल्याने ठेकेदार कंपनीची चांगलीच गोची झाली आहे. प्रशासकीय अडथळे तातडीने ...

- आविष्कार देसाई  अलिबाग : जलस्वराज्य टप्पा दोनअंतर्गत दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आखलेली २४ कोटी रुपयांची पाऊस पाणी संकलन योजना थंडावली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या लालफीतशाहीमुळे वेळेत निधी वितरीत न झाल्याने ठेकेदार कंपनीची चांगलीच गोची झाली आहे. प्रशासकीय अडथळे तातडीने दूर केल्यास ठरलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण होणार आहे, अन्यथा पुढील वर्षीही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, तेथे मोठ्या संख्येने धरणे नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. दोन्ही जिल्ह्यातील काही गावांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारला खर्च करावा लागत आहे. पाणी उपलब्ध होत नसल्याने महिलांसह आबालवृद्धांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते, तर काहींना विकतचे पाणी घ्यावे लागते. काही वाड्या-वस्त्यांवर तर दूषित पाणी पिण्यावाचून पर्याय नसतो.यावर उपाययोजना म्हणून सरकारने जलस्वराज्य टप्पा दोनअंतर्गत पाऊस पाणी संकलन योजना आखली. जागतिक बँकेचे या योजनेला अर्थसाहाय्य आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनुक्रमे २७ आणि १४ अशा ४१ गावांचा समावेश या योजनेत करण्यात आलेला आहे. यासाठी आवश्यक असणारा २४ कोटी रुपयांचा निधीही आलेला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी निविदा प्रक्रियेनुसार रचना इंजिनीयर यांची ठेकेदार कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. जलस्वराज्य टप्पा दोन, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, आणि जिल्हा परिषदेचा पाणी व पुरवठा विभाग यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. मात्र तीन-तीन विभागाकडे काम असल्याने प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींसाठी चांगलाच वेळेचा खोळंबा होत आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे अशा पद्धतीचे प्रथमच काम आल्याने त्यांची तारांबळ उडत असल्याचे बोलले जाते. रायगड जिल्ह्यातील २७ पैकी १२ कामांचे फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे, तर पोलादपूर तालुक्यातील वाकण मुरावाडी, धनगरवाडी, पिंपळवाडी येथील कामे पूर्ण झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ कामे मंजूर करण्यात आली होती. पैकी सात कामांचे फाउंडेशनचे पूर्ण झाले आहे.निविदेतील अटी शर्तीनुसार झालेल्या कामांचे पैसे मिळणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत कामांचे फक्त दोन कोटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. त्यासाठी सरकारी यंत्रणांच्या मागे लागावे लागले, असे रचना इंजिनीयर्सचे डी.व्ही.रेडकर यांनी सांगितले. प्रशासकीय कामांत दिरंगाई होत असल्याने कामाचा वेगही मंदावला आहे. वेळेवर पैसे मिळाल्यावर कामालाही गती येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील पावसाळ््यात पाऊस पडल्यावर त्या टाक्यांमध्ये पाणी साठवले जाणार आहे. परंतु ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे जवळच्या स्रोतातून पाणी घेऊन ते टाक्यांमध्ये टाकले जाणार आहे. जेणेकरून नागरिकांना योजनेची माहिती होईल, असे रेडकर म्हणाले.योजना काय आहे?मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही त्याचा योग्य साठा करता येत नाही. यासाठी ग्रामीण ठिकाणच्या दुर्गम भागांमध्ये रॉस्टफ्री स्टील कंपनीच्या टाक्या बांधून त्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी त्या टाक्यांमध्ये साठवले जाणार आहे. या टाक्यांची क्षमता एक लाखापासून सहा लाख लिटरपर्यंत आहे. टंचाईच्या कालावधीमध्ये याच पाण्याचा वापर नागरिकांसाठी करणे सोयीस्कर ठरणार आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडे योजनेच्या तांत्रिक पाहणीचे काम आहे. जिल्ह्यातील कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. ही योजना जलसंजीवनी ठरणार आहे.- पुंडलिक साळुंखे, उपमुख्यकार्यकारी अधिकारीआविष्कार देसाई  

टॅग्स :Raigadरायगड