शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

दुर्मीळ गोरख चिंच वृक्षांना हवे अभय

By admin | Updated: January 11, 2016 02:05 IST

ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन

मुरुड : ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन हजार वर्षांहून अधिक काळ तग धरून राहतो. अलौकिक अशी या वृक्षाची महती आहे. खोकरी येथील सिध्दी राज्यकर्त्यांच्या ३५० वर्षांपूर्वीच्या मकबऱ्याजवळ ६ दुर्मीळ गोरख चिंचेचे महाकाय वृक्ष आहेत. स्थानिकांकडून या दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन व्हावे अशी मागणी होत आहे.जंजिरा-मुरुड या ऐतिहासिक नगरीला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. प्रदूषणमुक्त मुरु डची हिरवाई, स्वच्छ सागरकिनारे, जंजिरा, पद्मदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. २२ एकर परिसरात पहुडलेला बेलाग जंजिरा वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे. राजपुरीपासून जवळच असलेले खोकरीचे गुंबज मुगल आणि हिंदू स्थापत्य शिल्प शैलीचा मिलाप असलेले सिद्दीचे मकबरे आहेत. या दरम्यान अत्यंत दुर्मीळ ‘बाओबाब’ अर्थात गोरख चिंचेचे ६ महाकाय वृक्ष दिमाखात उभे आहेत. या वृक्षांचा बुंधा जाडसर छत्रीसारखा असणारा वरचाभाग हिरव्यकंच पानांनी आच्छादलेला असतो. वसंतऋतूत पालवी फुटते तर हिवाळ्यात झाडांची पानगळ होते. रिकाम्या फांद्या अवकाशात चिकटल्यासारख्या वाटतात. या वृक्षाची फळे माकडं चवीने फस्त करतात म्हणून ‘मंकी ब्रेड ट्री’ असेही संबोधतात. ‘क’ जीवनसत्त्व या फळांपासून मिळते. बियांपासून खाद्यतेलही मिळू शकते. याशिवाय सालांपासून दोरखंड, चटया, टोपल्या, कागद आणि कापडही बनू शकते. वृक्षाची मुळे ही औैषधी गुणधर्मयुक्त असतात. संत गोरक्षनाथ याच वृक्षाच्या शीतल छायेखाली शिष्यगणांशी संवाद करीत असत अशी आख्यायिका आहे. बाओबाब या वृक्षाचे आर्युमान सुमारे ३ हजार वर्षांइतके असते. उंची १६ ते २९ मीटरपर्यंतची आहे. ही वृक्षे कमालीची मोहक वाटतात. भारतात हा आफ्रिकन वृक्ष इ.स.१६०० च्या सुमारास हबसाण व्यापाऱ्यांनी आणला असावा असा तर्क आहे. जंजिऱ्यावर सिद्दीने याच सुमारास चढाई करून पाऊल टाकले. अलीकडे झालेल्या पर्यावरण सर्वेक्षणात जगाच्या पाठीवर बाओबाब या वृक्षांची संख्या सुमारे २०० च्या घरात असून भारतात केवळ ५० वृक्षच अस्तित्वात आहेत. बाओबाब झाडांजवळ पर्यावरण विभागाकडून फलक लावल्यास पर्यटकांना याची माहिती होईल व या दुर्मीळ वृक्ष गोरखचिंचेचे गुणधर्म समजतील, अशी स्थानिकांची अपेक्षा असून या वृक्षांचे संवर्धन व्हावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)