शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ गोरख चिंच वृक्षांना हवे अभय

By admin | Updated: January 11, 2016 02:05 IST

ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन

मुरुड : ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन हजार वर्षांहून अधिक काळ तग धरून राहतो. अलौकिक अशी या वृक्षाची महती आहे. खोकरी येथील सिध्दी राज्यकर्त्यांच्या ३५० वर्षांपूर्वीच्या मकबऱ्याजवळ ६ दुर्मीळ गोरख चिंचेचे महाकाय वृक्ष आहेत. स्थानिकांकडून या दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन व्हावे अशी मागणी होत आहे.जंजिरा-मुरुड या ऐतिहासिक नगरीला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. प्रदूषणमुक्त मुरु डची हिरवाई, स्वच्छ सागरकिनारे, जंजिरा, पद्मदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. २२ एकर परिसरात पहुडलेला बेलाग जंजिरा वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे. राजपुरीपासून जवळच असलेले खोकरीचे गुंबज मुगल आणि हिंदू स्थापत्य शिल्प शैलीचा मिलाप असलेले सिद्दीचे मकबरे आहेत. या दरम्यान अत्यंत दुर्मीळ ‘बाओबाब’ अर्थात गोरख चिंचेचे ६ महाकाय वृक्ष दिमाखात उभे आहेत. या वृक्षांचा बुंधा जाडसर छत्रीसारखा असणारा वरचाभाग हिरव्यकंच पानांनी आच्छादलेला असतो. वसंतऋतूत पालवी फुटते तर हिवाळ्यात झाडांची पानगळ होते. रिकाम्या फांद्या अवकाशात चिकटल्यासारख्या वाटतात. या वृक्षाची फळे माकडं चवीने फस्त करतात म्हणून ‘मंकी ब्रेड ट्री’ असेही संबोधतात. ‘क’ जीवनसत्त्व या फळांपासून मिळते. बियांपासून खाद्यतेलही मिळू शकते. याशिवाय सालांपासून दोरखंड, चटया, टोपल्या, कागद आणि कापडही बनू शकते. वृक्षाची मुळे ही औैषधी गुणधर्मयुक्त असतात. संत गोरक्षनाथ याच वृक्षाच्या शीतल छायेखाली शिष्यगणांशी संवाद करीत असत अशी आख्यायिका आहे. बाओबाब या वृक्षाचे आर्युमान सुमारे ३ हजार वर्षांइतके असते. उंची १६ ते २९ मीटरपर्यंतची आहे. ही वृक्षे कमालीची मोहक वाटतात. भारतात हा आफ्रिकन वृक्ष इ.स.१६०० च्या सुमारास हबसाण व्यापाऱ्यांनी आणला असावा असा तर्क आहे. जंजिऱ्यावर सिद्दीने याच सुमारास चढाई करून पाऊल टाकले. अलीकडे झालेल्या पर्यावरण सर्वेक्षणात जगाच्या पाठीवर बाओबाब या वृक्षांची संख्या सुमारे २०० च्या घरात असून भारतात केवळ ५० वृक्षच अस्तित्वात आहेत. बाओबाब झाडांजवळ पर्यावरण विभागाकडून फलक लावल्यास पर्यटकांना याची माहिती होईल व या दुर्मीळ वृक्ष गोरखचिंचेचे गुणधर्म समजतील, अशी स्थानिकांची अपेक्षा असून या वृक्षांचे संवर्धन व्हावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)