शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

नागोठणेत रणजी सामना : महाराष्ट्र सर्व बाद ४३४ धावा; झारखंड दुसऱ्या दिवसाअखेर २ बाद २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 23:59 IST

रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या.

नागोठणे : येथील रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या षट्कातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटका देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला, तेव्हा झारखंडची २ बाद २ अशी बिकट परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे अझीम काझी आणि विशांत मोरे या दोन फलंदाजांनी केलेली शतके, ही आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. झारखंडकडून उत्कर्ष सिंगने पाच बळी घेतले.

महाराष्ट्र झारखंड रणजी सामन्यात पहिल्या दिवशी महाराष्ट्राची ५ बाद ८८ अशी अवस्था असताना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या अझीम काझी आणि विशांत मोरे यांनी चिवट झुंज देत दोन्ही फलंदाजांनी शतके केल्याने महाराष्ट्राला ४३४ धावांपर्यंत मजल मारता आली. काझीने ५४४ मिनिटे खेळपट्टीवर राहून १४०, तर मोरेने ३२८ मिनिटे खेळून १२० धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपायला १९ मिनिटे शिल्लक असताना अक्षय पालकर १८ धावांवर राहुल शुक्लाच्या गोलंदाजीवर सुमित कुमार याच्या हातात झेल देऊन बाद झाल्याने महाराष्ट्राचा डाव ४३४ धावांवर संपुष्टात आला. झारखंडच्या पहिल्या षट्कात चौथ्या चेंडूवर कुमार देवव्रतला तंबूत धाडले. त्याच्या जागेवर आलेल्या उत्कर्ष सिंगने पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्यानेही यष्टिरक्षक विशांत मोरे याच्या हाती झेल देऊन आपला बळी दिला. एका षट्कातच पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केल्याने झारखंडाची अवस्था २ बाद २ अशी झाली आहे.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडक