शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:19 IST

खारेपाटातील शेतकरी आक्रमक : ३० वर्षांच्या नुकसानाची मागणी

अलिबाग : खारभूमी विभागाच्या अलिबाग उप विभागीय कार्यालयाने गेल्या ३० वर्षांत समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती व देखभाल केली नसल्याने खाडीचे खारे पाणी पिकत्या भातशेतीत घुसल्याने नुकसान झाले. गेल्या ३० वर्षांची नुकसानभरपाई शासनाच्या नियमाप्रमाणे तत्काळ मिळावी, या मागणीकरिता अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शहापूर, धेरंड या गावांतील ५४० बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ही भरपाई मिळावी यासाठी या बाधित शेतकऱ्यांनी व्यक्तिगत नुकसानभरपाई अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सोमवार व मंगळवारी रांगा लावून दाखल केले आहेत.

मी व माझे कुटुंब पिढ्यानपिढ्या कसणाºया आमच्या जमिनी शासकीय खारभूमी योजनेत समाविष्ट आहेत. त्यावरच आमची उपजीविका अवलंबून आहे. ही जमीन उच्चतम भरती रेषेच्या दोन मीटर खाली आहे. आमचे हे भातशेती क्षेत्र अंबाखोरे डावा कालव्याचे आश्वासित सिंचन क्षेत्र आहे. दरवर्षी एकरी २० क्विंटल भाताचे उत्पादन व ५२ शेतमजुरांना आश्वासित रोजगार मिळतो. याच शेताच्या बांधावर भाजीपाला व शेतात नैसर्गिक मासे किमान १०० किलो मिळत असल्याचे शेतकºयांनी आपल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.

खारभूमी विभागाने उघाडी व सरक्षक बंधारे यांची दुरुस्ती व देखभाल गेली ३० वर्षे केली नाही. परिणामी, आमची भातशेती जमीन नापीक होऊन किमान ५० हजार रुपयांचे दरवर्षी नुकसान झाले आहे. या पूर्वीच १६ मे २०१६ रोजी नुकसान भरपाई मिळावी म्हणून श्रमिक मुक्ती दल संघटनेच्या मार्गदर्शनाने सहायक कार्यकारी अभियंता खारभूमी उपविभाग अलिबाग यांच्याकडे अर्ज केला. या अर्जानुसार नुकसानभरपाई मिळावी म्हणून खारभूमी विभागाने तहसीलदार अलिबाग यांच्याकडे त्याचे जावक पत्र २ जून २०१६ रोजी व सोबत ५४० शेतकºयांची यादी पाठवली. अलिबाग उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी रायगड यांनी समुद्र उधाणामुळे नुकसान झालेले शेतकरी, नुकसानभरपाईस पात्र असल्याचे अहवाल शासनास दिला असल्याची या मागणी पत्रात आठवण करून दिली आहे.

प्रतिहेक्टर ३७,५०० रुपये भरपाईचा निर्णय८ नोव्हेंबर २०१६ रोजी जलसंपदा विभागाचे कोकण प्रदेश मुख्य कार्यकारी अभियंता खलील अन्सारी यांच्या समवेत श्रमिक मुक्ती दलाची बैठक झाली. उधाणामुळे शेतपिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास शेतकºयांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली. त्यानुसार भरपाई देण्याचा निर्णय राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळ उप समीतीने घेवून तशी घोषणा देखील केली आहे. खाºयापाण्यामुळे शेतजमिनीचे कायमस्वरूपी नुकसान झाल्यास प्रतिहेक्टर ३७ हजार ५०० रुपये एवढी मदत देण्याचे निश्चित केले आहे. तरी त्याची अंमलबजावणी करून ती आमच्या बँक खात्यात जमा करावी, अशी अंतिम मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे अशी माहिती श्रमिक मुक्तीदलाचे समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.