शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:19 IST

खारेपाटातील शेतकरी आक्रमक : ३० वर्षांच्या नुकसानाची मागणी

अलिबाग : खारभूमी विभागाच्या अलिबाग उप विभागीय कार्यालयाने गेल्या ३० वर्षांत समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती व देखभाल केली नसल्याने खाडीचे खारे पाणी पिकत्या भातशेतीत घुसल्याने नुकसान झाले. गेल्या ३० वर्षांची नुकसानभरपाई शासनाच्या नियमाप्रमाणे तत्काळ मिळावी, या मागणीकरिता अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शहापूर, धेरंड या गावांतील ५४० बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ही भरपाई मिळावी यासाठी या बाधित शेतकऱ्यांनी व्यक्तिगत नुकसानभरपाई अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सोमवार व मंगळवारी रांगा लावून दाखल केले आहेत.

मी व माझे कुटुंब पिढ्यानपिढ्या कसणाºया आमच्या जमिनी शासकीय खारभूमी योजनेत समाविष्ट आहेत. त्यावरच आमची उपजीविका अवलंबून आहे. ही जमीन उच्चतम भरती रेषेच्या दोन मीटर खाली आहे. आमचे हे भातशेती क्षेत्र अंबाखोरे डावा कालव्याचे आश्वासित सिंचन क्षेत्र आहे. दरवर्षी एकरी २० क्विंटल भाताचे उत्पादन व ५२ शेतमजुरांना आश्वासित रोजगार मिळतो. याच शेताच्या बांधावर भाजीपाला व शेतात नैसर्गिक मासे किमान १०० किलो मिळत असल्याचे शेतकºयांनी आपल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.

खारभूमी विभागाने उघाडी व सरक्षक बंधारे यांची दुरुस्ती व देखभाल गेली ३० वर्षे केली नाही. परिणामी, आमची भातशेती जमीन नापीक होऊन किमान ५० हजार रुपयांचे दरवर्षी नुकसान झाले आहे. या पूर्वीच १६ मे २०१६ रोजी नुकसान भरपाई मिळावी म्हणून श्रमिक मुक्ती दल संघटनेच्या मार्गदर्शनाने सहायक कार्यकारी अभियंता खारभूमी उपविभाग अलिबाग यांच्याकडे अर्ज केला. या अर्जानुसार नुकसानभरपाई मिळावी म्हणून खारभूमी विभागाने तहसीलदार अलिबाग यांच्याकडे त्याचे जावक पत्र २ जून २०१६ रोजी व सोबत ५४० शेतकºयांची यादी पाठवली. अलिबाग उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी रायगड यांनी समुद्र उधाणामुळे नुकसान झालेले शेतकरी, नुकसानभरपाईस पात्र असल्याचे अहवाल शासनास दिला असल्याची या मागणी पत्रात आठवण करून दिली आहे.

प्रतिहेक्टर ३७,५०० रुपये भरपाईचा निर्णय८ नोव्हेंबर २०१६ रोजी जलसंपदा विभागाचे कोकण प्रदेश मुख्य कार्यकारी अभियंता खलील अन्सारी यांच्या समवेत श्रमिक मुक्ती दलाची बैठक झाली. उधाणामुळे शेतपिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास शेतकºयांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली. त्यानुसार भरपाई देण्याचा निर्णय राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळ उप समीतीने घेवून तशी घोषणा देखील केली आहे. खाºयापाण्यामुळे शेतजमिनीचे कायमस्वरूपी नुकसान झाल्यास प्रतिहेक्टर ३७ हजार ५०० रुपये एवढी मदत देण्याचे निश्चित केले आहे. तरी त्याची अंमलबजावणी करून ती आमच्या बँक खात्यात जमा करावी, अशी अंतिम मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे अशी माहिती श्रमिक मुक्तीदलाचे समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.