शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २३५ घरांना पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:28 IST

सद्यस्थितीतील पाऊस शेतीकरिता समाधानकारक असला तरी गेल्या महिन्याभराच्या पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील २३५ घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सद्यस्थितीतील पाऊस शेतीकरिता समाधानकारक असला तरी गेल्या महिन्याभराच्या पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील २३५ घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे आणि तशी भरपाईदेखील देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप भरपाई न मिळाल्याने ज्यांच्या घरांची पडझड झाली आहेत, ते नागरिक अडचणीत आले आहेत, तर काही ठिकाणी गुरांचे नऊ गोठे पडल्याने आठ जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.२३५ यापैकी ११ पक्की घरे कोसळली आहेत, मात्र शासकीय आर्थिक मदत त्यांना उपलब्ध झालेली नाही. ३२ पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली. त्यापैकी १४ घरमालकांना ३६ हजार ४०० रुपये सरकारी अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. १९२ कच्च्या घराची मोठी पडझड झाली. त्यापैकी १६४ घरमालकांना २ लाख ४४ हजार ७३६ रुपयांचे सरकारी आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. गुरांचे ९ गोठे पूर्णपणे कोसळले आहेत, मात्र त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचे आर्थिक साहाय्य प्राप्त झालेले नाही. जिल्ह्यात १३ सार्वजनिक मालमत्तांचे पावसामुळे २ लाख ५७ हजार रुपयांचे तर ८ खासगी मालमत्तांचे १ लाख ५८ हजार असे एकूण ४ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात दोन बळी गेले असून मृतांच्या कुटुंबीयांनादेखील अद्याप नुकसानभरपाई मिळेलेली नाही. मोठी दुधाळ जनावरे ३, ओढकाम करणारी मोठी जनावरे ३ आणि ओढकाम करणारी लहान जनावरे २ अशी एकूण ८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. मात्र, त्यांच्या मालक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. सरकारी नुकसानभरपाईचे पंचनामे सध्या सुरू असून ते प्राप्त होताच उर्वरित नुकसानभरपाई देण्याचे नियोजन असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात भात लावण्या अखेरच्या टप्प्यातपावसाच्या पुनरागमनामुळे भात लावण्यांनी जिल्ह्यात चांगलाच वेग घेतल्याने जिल्ह्यातील भात लावण्या अखेरच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. १ लाख २३ हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर भात लावणीचे नियोजन आहे. त्यापैकी गुरुवारअखेर ८६ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ७० ते ७५ टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. भात लावणीमध्ये रोहा तालुक्याने चांगलीच आघाडी घेतली असून येथे ९० टक्के लावण्या पूर्ण झाल्या आहेत. मुरु ड, महाड, पोलादपूर आणि म्हसळा या चार तालुक्यांत ८५ टक्के भात लावणी पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १ लाख ४१ हजार ४८३ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे १ लाख २३ हजार ७३० हेक्टर भाताखालील आहे. उर्वरित क्षेत्रात नागली, वरी, अन्य तृणधान्य व कडधान्य पिकांच्या लागवडीचे नियोजन आहे. या पिकांच्या पेरण्यांनादेखील वेग आला आहे. रोहा येथे सर्वाधिक १३८ मि. मी. पावसाची नोंदगुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १३८ मि.मी. पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. याच २४ तासांत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७३.०६ होते. अलिबाग येथे ७४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून पेण ११० मि.मी., मुरु ड ९७ मि.मी., पनवेल २२ मि.मी., उरण ३३ मि.मी., कर्जत ३४.८० मि.मी., खालापूर ६७ मि.मी., माणगाव ९४ मि.मी., सुधागड ८८.३३ मि.मी., तळा ९५ मि.मी., महाड ८० मि.मी., पोलादपूर ५८, म्हसळा ८०.८० मि.मी., श्रीवर्धन ५० मि.मी., माथेरान ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.