शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच

By admin | Updated: September 25, 2016 04:14 IST

सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील

अलिबाग : सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील चरी, ताडवागळे, पेझारी, देहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे तर पेण तालुक्यातील पाटणी व पांडापूर या गावांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ‘लोकमत’ला दिली. सर्व गावांतील नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु असून ते प्राप्त झाल्यावर नेमक्या किती घरातील किती कुटूंबाचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, या बाबत माहिती स्पष्ट होईल, असेही पाणबुडे यांनी पुढे सांगीतले.पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी येथे दरड कोसळल्याने १० घरे, १ विहिर व १ प्रवासी निवारा शेडचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कोतवाल खुर्द व कोतवाल बुद्रुक येथे नळपाणी पुरवठा करणाऱ्या ५ विहिरींची पडझड झाली आहे. तर २ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. बस प्रवासी निवारा शेडचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर येथील नळपाणी पुरवठा करणारी एक कोसळली असून लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. चरी गावांतील डिजिटल जि.प.शाळेसह सुमारे ६० घरांचे नुकसानशुक्रवार रात्रीच्या धुव्वाधार पावसाने अलिबाग तालुक्यांतील चरी गावास मोठा तडाखा दिली असून या गावातील डिजिटल जि.प.शाळेत पुराचे पाणी घुसल्याने सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षा विजया देविदास भगत व सदस्य सुधीर जाधव यांनी दिली आहे. गावांतील सुमारे ६० घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.ताडवागळे व वाघोडेमध्ये भातशेतीची मोठी हानीताडवागळे व वाघोडे ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक घरामध्ये पाणी जाऊ न मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळघर येथील बंधाऱ्याचे कठडे वाहून गेले असून आजुबाजूच्या शेतात पाणी गेल्याने परिसरातील शेकडो हेक्टर भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जलशोषण क्षमता कमी झाल्याने जमीन खचण्यास सुरुवातगेल्या ७२ तासांपासून पावसाच्या कहराने गेल्या २४ तासात रुद्रावतार धारण केला आहे. सततच्या पावसाने आता जमीनीतील जलशोषण क्षमता कमी होवू लागली असल्याने रस्ता खचणे, दरडीची माती ढासळणे, गावांगावात रस्त्यावर पाणी साचून राहाणे आणि त्यातच पाऊस कोसळतच असल््याने सखल भागांतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे तहसिलदारांचे आश्वासनदेहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे या भागात पुराने हाहाकार उडविल्याचे वृत्त समजताच रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती चित्रा पाटील, आस्वाद पाटील यांनी अलिबाग तहसिलदार यांचेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला व नुकसानीचे पंचनामे करणेचे निर्देश दिले. अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ यांनी नुकसान भरपाईने देण्यात येणार असल्याची माहिती दिले.