शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच

By admin | Updated: September 25, 2016 04:14 IST

सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील

अलिबाग : सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील चरी, ताडवागळे, पेझारी, देहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे तर पेण तालुक्यातील पाटणी व पांडापूर या गावांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ‘लोकमत’ला दिली. सर्व गावांतील नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु असून ते प्राप्त झाल्यावर नेमक्या किती घरातील किती कुटूंबाचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, या बाबत माहिती स्पष्ट होईल, असेही पाणबुडे यांनी पुढे सांगीतले.पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी येथे दरड कोसळल्याने १० घरे, १ विहिर व १ प्रवासी निवारा शेडचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कोतवाल खुर्द व कोतवाल बुद्रुक येथे नळपाणी पुरवठा करणाऱ्या ५ विहिरींची पडझड झाली आहे. तर २ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. बस प्रवासी निवारा शेडचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर येथील नळपाणी पुरवठा करणारी एक कोसळली असून लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. चरी गावांतील डिजिटल जि.प.शाळेसह सुमारे ६० घरांचे नुकसानशुक्रवार रात्रीच्या धुव्वाधार पावसाने अलिबाग तालुक्यांतील चरी गावास मोठा तडाखा दिली असून या गावातील डिजिटल जि.प.शाळेत पुराचे पाणी घुसल्याने सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षा विजया देविदास भगत व सदस्य सुधीर जाधव यांनी दिली आहे. गावांतील सुमारे ६० घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.ताडवागळे व वाघोडेमध्ये भातशेतीची मोठी हानीताडवागळे व वाघोडे ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक घरामध्ये पाणी जाऊ न मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळघर येथील बंधाऱ्याचे कठडे वाहून गेले असून आजुबाजूच्या शेतात पाणी गेल्याने परिसरातील शेकडो हेक्टर भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जलशोषण क्षमता कमी झाल्याने जमीन खचण्यास सुरुवातगेल्या ७२ तासांपासून पावसाच्या कहराने गेल्या २४ तासात रुद्रावतार धारण केला आहे. सततच्या पावसाने आता जमीनीतील जलशोषण क्षमता कमी होवू लागली असल्याने रस्ता खचणे, दरडीची माती ढासळणे, गावांगावात रस्त्यावर पाणी साचून राहाणे आणि त्यातच पाऊस कोसळतच असल््याने सखल भागांतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे तहसिलदारांचे आश्वासनदेहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे या भागात पुराने हाहाकार उडविल्याचे वृत्त समजताच रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती चित्रा पाटील, आस्वाद पाटील यांनी अलिबाग तहसिलदार यांचेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला व नुकसानीचे पंचनामे करणेचे निर्देश दिले. अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ यांनी नुकसान भरपाईने देण्यात येणार असल्याची माहिती दिले.