शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच

By admin | Updated: September 25, 2016 04:14 IST

सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील

अलिबाग : सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील चरी, ताडवागळे, पेझारी, देहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे तर पेण तालुक्यातील पाटणी व पांडापूर या गावांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ‘लोकमत’ला दिली. सर्व गावांतील नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु असून ते प्राप्त झाल्यावर नेमक्या किती घरातील किती कुटूंबाचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, या बाबत माहिती स्पष्ट होईल, असेही पाणबुडे यांनी पुढे सांगीतले.पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी येथे दरड कोसळल्याने १० घरे, १ विहिर व १ प्रवासी निवारा शेडचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कोतवाल खुर्द व कोतवाल बुद्रुक येथे नळपाणी पुरवठा करणाऱ्या ५ विहिरींची पडझड झाली आहे. तर २ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. बस प्रवासी निवारा शेडचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर येथील नळपाणी पुरवठा करणारी एक कोसळली असून लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. चरी गावांतील डिजिटल जि.प.शाळेसह सुमारे ६० घरांचे नुकसानशुक्रवार रात्रीच्या धुव्वाधार पावसाने अलिबाग तालुक्यांतील चरी गावास मोठा तडाखा दिली असून या गावातील डिजिटल जि.प.शाळेत पुराचे पाणी घुसल्याने सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षा विजया देविदास भगत व सदस्य सुधीर जाधव यांनी दिली आहे. गावांतील सुमारे ६० घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.ताडवागळे व वाघोडेमध्ये भातशेतीची मोठी हानीताडवागळे व वाघोडे ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक घरामध्ये पाणी जाऊ न मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळघर येथील बंधाऱ्याचे कठडे वाहून गेले असून आजुबाजूच्या शेतात पाणी गेल्याने परिसरातील शेकडो हेक्टर भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जलशोषण क्षमता कमी झाल्याने जमीन खचण्यास सुरुवातगेल्या ७२ तासांपासून पावसाच्या कहराने गेल्या २४ तासात रुद्रावतार धारण केला आहे. सततच्या पावसाने आता जमीनीतील जलशोषण क्षमता कमी होवू लागली असल्याने रस्ता खचणे, दरडीची माती ढासळणे, गावांगावात रस्त्यावर पाणी साचून राहाणे आणि त्यातच पाऊस कोसळतच असल््याने सखल भागांतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे तहसिलदारांचे आश्वासनदेहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे या भागात पुराने हाहाकार उडविल्याचे वृत्त समजताच रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती चित्रा पाटील, आस्वाद पाटील यांनी अलिबाग तहसिलदार यांचेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला व नुकसानीचे पंचनामे करणेचे निर्देश दिले. अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ यांनी नुकसान भरपाईने देण्यात येणार असल्याची माहिती दिले.