शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रायगडात पावसाचे थैमान

By admin | Updated: May 6, 2015 23:30 IST

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह दाखल झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली.

अलिबाग : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह दाखल झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. गेल्या २४ तासांत ५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरांचे आणि आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणच्या नुकसानीची आकडेवारी घेण्यास सुरुवात केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.मंगळवारी दुपारनंतर आकाशात ढग दाटून काळोख पसरला. अधूनमधून विजेचा गडगडाट होत होता. त्यानंतर पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. महाड तालुक्यातील काकरतळे येथे चार घरांवर वीज कोसळली, त्याचप्रमाणे एका गोठ्याचेही नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यातही पावसाने प्रचंड धुमाकूळ घालत साई मंदिर परिसरातील एक वृक्ष कोसळले. यामध्येही कोणतीही हानी झाली नसली तरी, सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.पावसाची बरसात होत असतानाच काही ठिकाणी विजेचा लंपडाव सुरू होता. गेल्या चार महिन्यांत पाच वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा आणि काजू पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ४० टक्केच उत्पादन होणार असल्याचे आंबा बागायतदार शेतकरी डॉ. जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.आंब्याचे फळ तयार झाल्यावर पावसाचा त्यावर विशेष परिणाम होत नाही. मात्र वादळी वाऱ्यासह मंगळवारी झालेल्या पावसाने आंबा गळतीचे प्रमाण वाढले, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)