शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

रायगडात पावसाचे थैमान

By admin | Updated: May 6, 2015 23:30 IST

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह दाखल झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली.

अलिबाग : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह दाखल झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. गेल्या २४ तासांत ५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरांचे आणि आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणच्या नुकसानीची आकडेवारी घेण्यास सुरुवात केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.मंगळवारी दुपारनंतर आकाशात ढग दाटून काळोख पसरला. अधूनमधून विजेचा गडगडाट होत होता. त्यानंतर पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. महाड तालुक्यातील काकरतळे येथे चार घरांवर वीज कोसळली, त्याचप्रमाणे एका गोठ्याचेही नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यातही पावसाने प्रचंड धुमाकूळ घालत साई मंदिर परिसरातील एक वृक्ष कोसळले. यामध्येही कोणतीही हानी झाली नसली तरी, सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.पावसाची बरसात होत असतानाच काही ठिकाणी विजेचा लंपडाव सुरू होता. गेल्या चार महिन्यांत पाच वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा आणि काजू पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ४० टक्केच उत्पादन होणार असल्याचे आंबा बागायतदार शेतकरी डॉ. जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.आंब्याचे फळ तयार झाल्यावर पावसाचा त्यावर विशेष परिणाम होत नाही. मात्र वादळी वाऱ्यासह मंगळवारी झालेल्या पावसाने आंबा गळतीचे प्रमाण वाढले, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)